शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

माहूर तहसीलवर दिव्यांगांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:29 IST

अंध, अपंग वृद्ध व शेतमजूर यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने चालढकल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. बच्चू कडूप्रणीत प्रहार अपंग क्रांती संघटना नांदेड व तालुका शाखा माहूरच्या वतीने २७ मे रोजी सकाळी ११ वा. कपिलेश्वर धर्मशाळा ते माहूर तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्दे४४ अंश सेल्सिअस तापमानात निघाला मोर्चा मागणी केल्यानंतर प्रशासनाकडून पाण्याची व्यवस्था

श्रीक्षेत्र माहूर : अंध, अपंग वृद्ध व शेतमजूर यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने चालढकल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. बच्चू कडूप्रणीत प्रहार अपंग क्रांती संघटना नांदेड व तालुका शाखा माहूरच्या वतीने २७ मे रोजी सकाळी ११ वा. कपिलेश्वर धर्मशाळा ते माहूर तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.यावेळी माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर व माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहाण यांनी मोर्चाला सामोरे जावून पाच दिवसांत दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याशिवाय दिव्यांगांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यास कारणीभूत आपाआपल्या अखत्यारितील कर्मचाऱ्याविरुद्ध तत्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख पिंपळगावकर, जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना विठ्ठलराव मंगनाळे, राजेश बेळगे, गणेश पाटील बाळासाहेब डाकोरे, माहूर तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर, विद्या चव्हाण, वैशाली शेंडे, सुनीता गरड, विकी मोरे, एकनाथ मानकर आदींनी केले. मोर्चात जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष व नांदेड जिल्हा प्रहार अपंग क्रांती संघटना व माहूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.दिव्यांगांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याबाबत राज्यकर्त्याकडून सातत्याने हमी दिल्या जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी प्रशासन यंत्रणा मात्र दिव्यांगांचे प्रश्न, सोडविण्याच्या कामास उदासीनता दाखवीत असल्याने दिव्यांगांचे अनेक प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. अपंग कायद्याची अंमलबजावणी करा, ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांना ३ टक्के व ५ टक्के मानधन त्वरित वाटप करा, ग्रामपंचायतमध्ये जन्म- मृत्यू नोंद रजिस्टरप्रमाणे दिव्यांगांच्या अद्ययावत नोंदी घ्या, दिव्यांगांना व्यवसायासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा उपलब्ध करून द्याव्या, दिव्यांगांना गृहकरामध्ये ५० टक्के सूट द्यावी, घरकुलाचा लाभ द्यावा, विनाअट शौचालये बांधून द्यावी, अपंगांच्या बचत गटास अर्थसहाय करावे, ५० हजारांच्या उत्पनाचे प्रमाणपत्र विनाअट द्यावे दिव्यांगासाठी व्हीलचेअर खरेदी केलेल्या ग्रा.पं.ची यादी द्यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी माहूर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव परित्यक्ता, विधवा, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक मोर्चेकऱ्यांना उन्हाचा त्रास होत असल्याने संघटनेच्या नेत्यांनी मोर्चेकरी दिव्यांग असल्याचे माहीत असतानासुद्धा प्रशासनाने साधे पिण्याचे पाण्याचीसुद्धा व्यवस्था न ठेवल्याने तहसीलदारांना जाब विचारला, तेव्हा ऐनवेळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली.या होत्या दिव्यांगांच्या मागण्यादिव्यांगांना ३ टक्के व ५ टक्के मानधन त्वरित वाटप करा, ग्रा़प़ंमध्ये जन्म- मृत्यू नोंद रजिस्टरप्रमाणे दिव्यांगांच्या अद्ययावत नोंदी घ्या, दिव्यांगांना व्यवसायासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी जागा उपलब्ध करून द्यावी, दिव्यांगांना गृहकरामध्ये ५० टक्के सूट द्यावी, घरकुलाचा लाभ द्यावा, विनाअट शौचालये बांधून द्यावी.अपंगांच्या बचत गटास अर्थसहाय करावे, ५० हजारच्या उत्पनाचे प्रमाणपत्र, विनाअट द्यावे तसेच दिव्यांगांसाठी व्हीलचेअर खरेदी केलेल्या ग्रा.पं.ची यादी द्यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या़ तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव परित्यक्ता, विधवा,शेतमजुरांनी मोर्चात सहभाग घेतला़ यावेळी अनेक मोर्चेकºयांना उन्हाचा त्रास झाला़

टॅग्स :NandedनांदेडDivyangदिव्यांगagitationआंदोलन