शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा ...

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ३५ रुग्ण हे महापालिकेअंतर्गत गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत तर विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०, किनवट १ आणि देगलूर तालुक्यात एका रुग्णावर कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत चार रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७७८ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ५ लाख ८९ हजार ८९९ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला तर ९० हजार ७०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांपैकी ८७ हजार ९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी २ हजार ६६० रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सध्या आता उपचारानंतर घरी परतण्याचे प्रमाण ९७.१ टक्के इतके झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ ऑगस्ट २०२० रोजी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळले होते तर दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण हे ११ एप्रिल २०२१ रोजी आढळले होते. जिल्ह्यात १०१ रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यात १ हजार १३१ अतिदक्षता बेड होते. तर ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या २ हजार ३१२ इतकी होती. जिल्ह्यात ८ हजार २९६ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तर २३६ व्हेन्टीलेटरही रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.

जिल्ह्यात कोरोना मुक्तीवर मात करण्यासाठी उपयोगात आणलेल्या तालुक्यातील भोसी पॅटर्नची पंतप्रधानांनीही दखल घेतली होती. येथे रुग्णांना शेतामध्ये विलगीकरणात ठेवून संपूर्ण गाव एका ठराविक कालावधीत कोरोनामुक्त करण्यात आले होते. हा पॅटर्न उपयुक्त असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले होते. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. जिल्ह्यात आजघडीला ८ लाख ८९ हजार ८४६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

ग्रामीणमध्ये ९ टक्के मुले बाधित

ग्रामीण भागात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २ हजार २०८ मुले बाधित झाली होती तर दोघांचा मृत्यू झाला होता. ही मुले ० ते १५ वयोगटातील होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५ हजार ८२० मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. हे प्रमाण ८ टक्के इतके होते. एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता.

प्रतिबंधाची तयारी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीतीही आहेच. त्या दृष्टीनेही ग्रामीण भागात तयारी केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

दररोज दोन हजार चाचण्या

जिल्ह्यात कोरोना रुग्णावर वेळेवर उपचार करुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रतिदिन २ हजार चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्या मोहिमे अंतर्गतही चाचण्या वाढवण्यात येत आहेत.