शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा ...

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ३५ रुग्ण हे महापालिकेअंतर्गत गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत तर विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०, किनवट १ आणि देगलूर तालुक्यात एका रुग्णावर कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत चार रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७७८ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ५ लाख ८९ हजार ८९९ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला तर ९० हजार ७०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांपैकी ८७ हजार ९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी २ हजार ६६० रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सध्या आता उपचारानंतर घरी परतण्याचे प्रमाण ९७.१ टक्के इतके झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ ऑगस्ट २०२० रोजी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळले होते तर दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण हे ११ एप्रिल २०२१ रोजी आढळले होते. जिल्ह्यात १०१ रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यात १ हजार १३१ अतिदक्षता बेड होते. तर ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या २ हजार ३१२ इतकी होती. जिल्ह्यात ८ हजार २९६ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तर २३६ व्हेन्टीलेटरही रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.

जिल्ह्यात कोरोना मुक्तीवर मात करण्यासाठी उपयोगात आणलेल्या तालुक्यातील भोसी पॅटर्नची पंतप्रधानांनीही दखल घेतली होती. येथे रुग्णांना शेतामध्ये विलगीकरणात ठेवून संपूर्ण गाव एका ठराविक कालावधीत कोरोनामुक्त करण्यात आले होते. हा पॅटर्न उपयुक्त असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले होते. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. जिल्ह्यात आजघडीला ८ लाख ८९ हजार ८४६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

ग्रामीणमध्ये ९ टक्के मुले बाधित

ग्रामीण भागात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २ हजार २०८ मुले बाधित झाली होती तर दोघांचा मृत्यू झाला होता. ही मुले ० ते १५ वयोगटातील होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५ हजार ८२० मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. हे प्रमाण ८ टक्के इतके होते. एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता.

प्रतिबंधाची तयारी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीतीही आहेच. त्या दृष्टीनेही ग्रामीण भागात तयारी केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

दररोज दोन हजार चाचण्या

जिल्ह्यात कोरोना रुग्णावर वेळेवर उपचार करुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रतिदिन २ हजार चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्या मोहिमे अंतर्गतही चाचण्या वाढवण्यात येत आहेत.