शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा ...

जिल्ह्यात १ हजार ६०४ गावे आहेत. यापैकी सर्वच गावे आता कोरोनामुक्त आहेत. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्ये महापालिका आणि तालुकास्तरावरील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील ३५ रुग्ण हे महापालिकेअंतर्गत गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत तर विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०, किनवट १ आणि देगलूर तालुक्यात एका रुग्णावर कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत चार रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७७८ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील ५ लाख ८९ हजार ८९९ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला तर ९० हजार ७०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांपैकी ८७ हजार ९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी २ हजार ६६० रुग्ण हे कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सध्या आता उपचारानंतर घरी परतण्याचे प्रमाण ९७.१ टक्के इतके झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ७ ऑगस्ट २०२० रोजी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळले होते तर दुसऱ्या लाटेत एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण हे ११ एप्रिल २०२१ रोजी आढळले होते. जिल्ह्यात १०१ रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. त्यात १ हजार १३१ अतिदक्षता बेड होते. तर ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या २ हजार ३१२ इतकी होती. जिल्ह्यात ८ हजार २९६ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तर २३६ व्हेन्टीलेटरही रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.

जिल्ह्यात कोरोना मुक्तीवर मात करण्यासाठी उपयोगात आणलेल्या तालुक्यातील भोसी पॅटर्नची पंतप्रधानांनीही दखल घेतली होती. येथे रुग्णांना शेतामध्ये विलगीकरणात ठेवून संपूर्ण गाव एका ठराविक कालावधीत कोरोनामुक्त करण्यात आले होते. हा पॅटर्न उपयुक्त असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले होते. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे. जिल्ह्यात आजघडीला ८ लाख ८९ हजार ८४६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

ग्रामीणमध्ये ९ टक्के मुले बाधित

ग्रामीण भागात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २ हजार २०८ मुले बाधित झाली होती तर दोघांचा मृत्यू झाला होता. ही मुले ० ते १५ वयोगटातील होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५ हजार ८२० मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. हे प्रमाण ८ टक्के इतके होते. एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता.

प्रतिबंधाची तयारी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीतीही आहेच. त्या दृष्टीनेही ग्रामीण भागात तयारी केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

दररोज दोन हजार चाचण्या

जिल्ह्यात कोरोना रुग्णावर वेळेवर उपचार करुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रतिदिन २ हजार चाचण्या केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने चाचण्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्या मोहिमे अंतर्गतही चाचण्या वाढवण्यात येत आहेत.