शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

उभ्या पिकावर नांगर फिरवलेल्या शेतक-यांशी आणेवारीसंदर्भात जिल्हा कृषीअधिका-यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 15:57 IST

जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन,  तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नांदेड : माळाकोळी येथे पीक आणेवारी चुकीची काढल्यामुळे शेतक-यांनी प्रशासनाच्या निषेधात  वाजत गाजत उभ्या पिकावर नांगर फिरवला होता. तसेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन १३ नोव्हेंबर रोजी शिवाजी चौकात आंदोलन केले होते़ याची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.

१४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी मोहन शुर, उत्तम घुगे, अर्जुनसिंह बयास यांच्या शेतातील उभ्या पिकाची तसेच उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन,  तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बंटी तिडके या शेतक-याने परतीच्या मान्सूनमुळे खराब झालेले सोयाबीन दाखवले व ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे सांगितले़.

तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, सरपंच जालींदर कागणे,  ज्ञानेश्वर गीते, पर्यवेक्षक सदानंद पोटपल्लेवार, कृषी सहायक बालाजी चिखलीकर, शामसिंह बयास, विठ्ठल जिलेवाड, शंकर तिडके, बालाजी तिडके,  बंडु केंद्रे, आदीनाथ मुस्तापुरे,  राजु फुलारी,  अर्जुनसिंह बयास,  सुधाकर राठोड,  जगन्नाथ तिडके, निळकंठ तिडके, रघनाथ मोरे विनायक जोशी, राम पवार,  व्यंकटराव पवार  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी डॉ़ तुकाराम मोटे म्हणाले, या भागातील जमीन ही कोरडवाहू व हलक्या प्रतीची असून जूनपासून दोनवेळा पावसाचा पडलेला खंड व पिकावर पडलेले रोग यामुळे या भागातील पिकांचे नुकसान झाले असून आणेवारी संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन वास्तव परिस्थितीचे कथन करणार असल्याची माहिती उपस्थित शेतक-यांना दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड