शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

उभ्या पिकावर नांगर फिरवलेल्या शेतक-यांशी आणेवारीसंदर्भात जिल्हा कृषीअधिका-यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 15:57 IST

जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन,  तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नांदेड : माळाकोळी येथे पीक आणेवारी चुकीची काढल्यामुळे शेतक-यांनी प्रशासनाच्या निषेधात  वाजत गाजत उभ्या पिकावर नांगर फिरवला होता. तसेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन १३ नोव्हेंबर रोजी शिवाजी चौकात आंदोलन केले होते़ याची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.

१४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी मोहन शुर, उत्तम घुगे, अर्जुनसिंह बयास यांच्या शेतातील उभ्या पिकाची तसेच उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन,  तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बंटी तिडके या शेतक-याने परतीच्या मान्सूनमुळे खराब झालेले सोयाबीन दाखवले व ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे सांगितले़.

तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, सरपंच जालींदर कागणे,  ज्ञानेश्वर गीते, पर्यवेक्षक सदानंद पोटपल्लेवार, कृषी सहायक बालाजी चिखलीकर, शामसिंह बयास, विठ्ठल जिलेवाड, शंकर तिडके, बालाजी तिडके,  बंडु केंद्रे, आदीनाथ मुस्तापुरे,  राजु फुलारी,  अर्जुनसिंह बयास,  सुधाकर राठोड,  जगन्नाथ तिडके, निळकंठ तिडके, रघनाथ मोरे विनायक जोशी, राम पवार,  व्यंकटराव पवार  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी डॉ़ तुकाराम मोटे म्हणाले, या भागातील जमीन ही कोरडवाहू व हलक्या प्रतीची असून जूनपासून दोनवेळा पावसाचा पडलेला खंड व पिकावर पडलेले रोग यामुळे या भागातील पिकांचे नुकसान झाले असून आणेवारी संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन वास्तव परिस्थितीचे कथन करणार असल्याची माहिती उपस्थित शेतक-यांना दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड