शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

धर्माबाद तालुक्यात २ हजार हेक्टर तूर धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:06 IST

पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

धर्माबाद : पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने कापूस या पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याच सोबत शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तुरीला शेंगा, फुलांची लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व शेंगा पोखरणाºया अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकºयांना पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तूर पिकांची फुले गळणे सुरू झाले असून, पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.या शेंगा पोखरणाºया आळीवर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी, ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताच पर्याय नाही. त्यामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात गट होण्याची भीती आहे. आता ढगाळ वातावरणा बरोबरच धूके पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.याबाबत धर्माबादचे तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी शेतकºयांनी त्वरित किटकनाशकांची फवारणी करून घ्यावी. शेतकºयांना याबद्दल मार्गदर्शन तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव यांनी दिली आहे.तीन मंडळातंर्गत २ हजार ४२ हेक्टर तुरीची लागवडधर्माबाद तालुका कृषी कार्यालयातंर्गत तीन मंडळ असून धर्माबाद मंडळामध्ये ५३४ हेक्टर तुरीची लागवड करण्यात अली आहे. याबरोबर जारीकोट मंडळामध्ये ७५४ हेक्टर आणि करखेली मंडळातंर्गत ७५४ हेक्टरमध्ये तुरीची लागवड करण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यात एकूण २ हजार ४२ हेक्टरमध्ये तुरीची लागवड करण्यात आली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.उत्पादनात घट होणारतूर पिकांची फुले गळणे सुरू झाले असून पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुभार्व पिकावर झाला आहे़ यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भिती शेतकºयांना व्यक्त केली़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती