शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वेदनेशी मैत्री करीत दिव्यांगांनी केली आयुष्याची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:22 IST

वेदना उराशी, दु:ख पायथ्याला, हेच जगणे आहे, एवढेच ठावे मला़़़ अगदी असेच जीवन जगणाऱ्या दोन दिव्यांग बंधुंनी आपल्या वेदनेवर मात करीत आपल्या वृद्ध आई, वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गिरणी व किराणा दुकानाच्या माध्यमातून आयुष्याशी दोन हात केले आहेत़ आज या दोन्ही भावांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचीही उभारणी केली आहे़

भारत दाढेल।नांदेड : वेदना उराशी, दु:ख पायथ्याला, हेच जगणे आहे, एवढेच ठावे मला़़़ अगदी असेच जीवन जगणाऱ्या दोन दिव्यांग बंधुंनी आपल्या वेदनेवर मात करीत आपल्या वृद्ध आई, वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गिरणी व किराणा दुकानाच्या माध्यमातून आयुष्याशी दोन हात केले आहेत़ आज या दोन्ही भावांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचीही उभारणी केली आहे़तरोडा खु़ भागातील मालेगावरोडवर जैनमंदिराजवळ किरायाच्या जागेत गिरणी व किराणा दुकान थाटून कुटुंबाचा भार उचलणा-या दिव्यांग बंधुंचा जीवनप्रवास अत्यंत वेदनादायी आहे़ शारीरिक वेदना सहन करीत या दोन्ही दिव्यांग बंधुंनी आपल्या व्यवसायात प्रगती करून दाखवली आहे़ मनोज किशोरराव पिंपळे (वय ३५) व गजानन पिंपळे (वय ३१) हे दोघे सख्खे भाऊ़ गजानन पिंपळे हे जन्मत:च दिव्यांग आहेत़ त्यांना दोन्ही पायाने चालता येत नाही़ तर मनोज यांना वयाच्या १३ व्या वर्षी पाठीच्या कण्याचा आजार झाला आणि त्यानंतर हळूहळू कमरेपासून खाली त्यांचे शरीर कमजोर झाले़ मानेपर्यंत आखडून गेल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नाही़ त्यामुळे एका जागेवरच बसून ते दुकानाचे काम पहातात़ तर लहान बंधू गजानन यांनाही कमरेखाली मोठे छिद्र पडल्यामुळे त्यांचे आॅपरेशन करणे गरजेचे आहे़ या दोन्ही भावांचे दिव्यांगत्व आणि त्यात मोठे आजार सोबत घेवून हे दोन्ही बंधू आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात़ मोठ्या भावाच्या उपचारासाठी मोठा खर्च लागणार आहे़़ आर्थिक परिस्थती नाजूक असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नाही़ अशाही परिस्थितीत दर महिन्याला मनोज यांच्या औषधांसाठी दहा हजार खर्च करावे लागतात़ महिन्याकाठी गिरणी व किराणा दुकानात मिळणाºया पैशातून जागेचा किराया व औषधींसाठी खर्च होतो़ वडील किशोरराव पिंपळे व आई मंगलाबाई यांनी सांगितले की, मुलांनी जिद्दीने व्यवसाय चालवून पोटाचा प्रश्न सोडविला. मात्र मुलांना अपंगत्वाचे प्रमाणपत्रही कमी टक्के देण्यात आले आहे़ त्यामुळे शासनाच्या योजनाही मिळत नाहीत़

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिकDivyangदिव्यांग