शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Devendra Fadanvis : बायकोनं मारलं तरी हे केंद्राकडे हात दाखवतील, फडणवीसांचा सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:53 IST

नांदेड जिल्ह्यातील देगुलर येथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार गरिबीविरोधी आहे, फक्त स्वत:च्या परिवारासाठी हे सरकार चालतंय.

ठळक मुद्देराज्य सरकारमधील लोकं अतिशय खोटारडे आहेत, दिवसभरात चार-पाचवेळा खोटं बोलल्याशिवाय त्यांना अन्नही जात नाही. त्यामुळे, दिवसभर खोटं बोलतात, काहीही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवतात.

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. गुडघाभर चिखलात आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर जाऊन त्यांच्या पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांना धीर दिला. अतिवृष्टीने शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, वयात आलेलं 17-18 वर्षाचं पोरगं निघून जावं, तशी अवस्था उभं पीक गेल्यानं राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. मात्र, सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीकविमाही नीट मिळेनासा झालाय, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. तसेच, राज्य सरकार विनाकारण सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचेही सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील देगुलर येथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार गरिबीविरोधी आहे, फक्त स्वत:च्या परिवारासाठी हे सरकार चालतंय. तुमच्या आणि आमच्या हिस्स्याचा पैसा यांच्या घरात जातोय, इंटरनेटच्या जमान्यातील कॉम्प्युटराईज भ्रष्ट्राचार या सरकारच्या माध्यमातून होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था आहे. या सरकारने मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद करुन टाकलं, कवचकुंडल बंद करुन टाकली. अशोकराव तुम्ही मुंख्यमंत्री होतात, ज्येष्ठ नेते आहात, मग वैधानिक विकास मंडळ बंद केल्यावर तुम्ही एक शब्द का काढला नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. 

राज्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली, पण कुणी येऊन पाहायला तयार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, शेतकरी रडत होतो, त्याच्या शेतात अन् डोळ्यातही पाणी होतं. पण, सरकार एक नवा पैसा द्यायला तयार नाही. विम्याचे पेसैही शेतकऱ्यांना मिळत नाहीत, आमचं सरकार होतं तेव्हा वर्षातून 4 वेळा पैसे मिळाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत होते. आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पडतोय, 10 हजार कोटींची घोषणा केली. पण, मागच्या वर्षीच्या घोषणेचेच पैसे अद्याप मिळाले नाहीत. गेल्या वर्षभरात राज्याला केवळ 700 कोटी रुपये सरकारने दिले आहेत. मात्र, एकट्या नांदेड जिल्ह्याला आम्ही 500 कोटी रुपये दिले होते, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

राज्य सरकारमधील लोकं अतिशय खोटारडे आहेत, दिवसभरात चार-पाचवेळा खोटं बोलल्याशिवाय त्यांना अन्नही जात नाही. त्यामुळे, दिवसभर खोटं बोलतात, काहीही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मी म्हटलं, यांच्या बायकोनं जरी यांना मारलं तरी सांगतील केंद्र सरकारचा हात आहे. त्यांनी दाखवला म्हणून आम्हाला मारलं. केंद्रीय वित्तराज्यमंत्री यांनी सांगितलं की, राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याचा प्रिमीयमच भरला नाही, त्यामुळे कंपन्यांनी पीकविमा दिला नाही, असे फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकारFarmerशेतकरी