शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सहस्त्रकुंड धबधब्यात पडून रेल्वे अधीक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:43 IST

महिन्याच्या दुसऱ्या शनिवारनिमित्त सुटी असल्यामुळे रेल्वेचे कर्मचारी किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्यावर गेले होते़

इस्लापूर : महिन्याच्या दुसऱ्या शनिवारनिमित्त सुटी असल्यामुळे रेल्वेचे कर्मचारी किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्यावर गेले होते़ यावेळी जेवणाचे ताट धुण्यासाठी गेलेल्या रेल्वे अधीक्षकांचा पाय घसरुन ते धबधब्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली़गोविंद गोपाळराव बसवंते (वय ५०) असे मयत अधीक्षकाचे नाव आहे़ ते मुगट येथील रहिवासी होते. १२ जानेवारी रोजी कार्यालयाला सुटी असल्यामुळे रेल्वे खात्याचे कर्मचारी व्ही़एम़ पाटील, कट्टा राजू, गौतम, जयपाल लोखंडे, राजीव, शशिकांत गोपनारायण, देवीदास कटीया आदींसह गोविंद बसवंते हे सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेले होते़ धबधब्यावर बराच वेळ थांबल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण आटोपले़ जेवणानंतर ताट धुण्यासाठी बसवंते जात असताना त्यांचा पाय घसरून पाण्यात पडले़ही घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़ ही बाब इतर सहका-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ काही जणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला़ परंतु, अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते़रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाण्यात गळ टाकून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़ यावेळी सपोनि रामेश्वर कायंदे, विठू बोने, जमादार जाधव, तांबारे, गारोळे, कोकणे आदींची उपस्थिती होती़ या प्रकरणात इस्लापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूEmployeeकर्मचारी