शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

तंबाखूच्या भट्टीत पडून भाजल्याने शेतकरी पिता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:11 IST

सायंकाळी कुटुंबियांनी शेतात धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली़

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील चिकना येथे तंबाखूच्या भट्टीत पाय घसरून पडल्याने पिता- पुत्राचा भाजून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सकाळपासून शेतात गेल्यानंतरही सायंकाळपर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शेतात धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली़

धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती भागात अनेक शेतकरी तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात.  तंबाखू पिकास धूर देण्याची पद्धत आहे़ तंबाखू परिपक्व करण्यासाठी त्याला धूरावर भाजले जाते.  यासाठी लाकडाचा एक बंदिस्त मंडप तयार करुन त्यामध्ये आग पेटवून तंबाखूला धूरी देण्यात येते. 

सोमवारी सकाळी चिकना येथील शेख चाँद पाशा खाजामियॉ (वय ५५) व त्यांचा मुलगा वंशजचाँद पाशा (२२) हे दोघे शेतात तंबाखूला धूर देण्यासाठी गेले होते़ दरम्यान, पाय घसरुन ते दोघेही भट्टीत पडले़ यात ते  भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ सकाळी शेतात गेलेले पिता-पुत्र सायंकाळपर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शेतात जावून पाहणी केली असता, तंबाखूच्या भट्टीत त्यांचे मृतदेह आढळून आले़ दोन्ही मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते

याबाबतची माहिती धर्माबादचे पोनि़भागवत जायभाये यांना देण्यात आली़ त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली़ या घटनेमुळे चिकना गावावर शोककळा पसरली होती़ 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेती