शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"लेकीचं लग्न, पण खर्चाची चिंता नाही!"; गरीब वधुपित्यांना आमदार राजेश पवारांचा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:33 IST

‘चिंता मिटली, नवरी सजली!’; नायगावात आमदार राजेश पवारांचा अनोखा उपक्रम चर्चेत

नांदेड : केवळ फोटो सेशनपुरते कार्य नको, तर प्रत्येक गोरगरिबापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी नायगाव मतदारसंघात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. विशेष म्हणजे उपवधूंच्या पित्यांना मुलींच्या लग्नासाठी हातभार लावणारी अफलातून योजना आमदार राजेश पवार हे त्यांच्या स्वखर्चातून मतदारसंघात राबवित आहेत. लेकीच्या सप्तपदीसाठी बापाला हातभार लावणाऱ्या या योजनेची नांदेडातच नव्हे, तर राज्यात चर्चा होत आहे.

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले. वैष्णवी हगवणे हीच्या आत्महत्येनंतर पुणे, अहिल्यानगर आदी ठिकाणच्या मराठा समाजाने लग्नांसाठी एक आचारसंहिता घालून दिली. त्यातून वधुपित्याचा होणारा अनाठायी खर्च टाळला जावा हा उद्दात्त हेतू आहे. परंतु, कोणत्याही पित्याला आपल्या मुलीच्या लग्नात जेवणावळी उठवाव्या वाटतात अन् लेकीचे लग्न थाटामाटात करावे वाटते. मात्र, त्यासाठी कर्ज काढणे अथवा जमीन, घर विक्री करून हा बडेजाव करणे चुकीचेच आहे. पण, अशा गोरगरीब अन् गरजू वधुपित्यांसाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी ‘चिंता मिटली, नवरी सजली!’ या संकल्पनेतून स्वखर्चातून एक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

सप्तपदीसाठी माझा हातभार... एक भाऊ म्हणून आमदार पवार यांचा हा छोटासा प्रयत्न अनेक बापांचे प्राण वाचविणारा अन् लेकीचे स्वप्न पूर्ण करणारा ठरत आहेत. मुलीच्या लग्नासाठी स्वखर्चातून आर्थिक मदत देणारी ही योजना मुलीचा पाठीराखा भाऊ, म्हणून चर्चेत आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ ते ६ लग्न एकत्र करणाऱ्यांना मंडप, जेवण किंवा भांडी यातील कोणताही एक पूर्ण खर्च, तसेच ७ ते १२ लग्न एकत्र होणार असतील तर मंडप आणि जेवणावळी असा दोन्हीचा संपूर्ण खर्च आमदार पवार स्वत: उचलणार आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात नायगाव मतदारसंघातील किमान २ मुलींचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या या योजनेचे वधुपित्यांसह समाजातून स्वागत होत आहे.

सामाजिक बांधिलकीतून उपक्रमलोकप्रतिनिधी म्हणून लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर अनेक गरीब पित्यांकडून केला जाणारा खर्च पाहवत नाही. अनेकजण लेकीच्या प्रेमापोटी व्याजाने पैसे काढून, जमीन विक्री करून लग्न करतात. त्यामुळे उद्या या बापाचे काय होणार? असा विचार करून मन विचलित होते. त्यातूनच एक भाऊ या नात्याने मतदारसंघातील मुलींच्या लग्नाला छोटीशी मदत म्हणून ‘चिंता मिटली, नवरी सजली!’ या संकल्पनेतून एक योजना स्वखर्चातून सुरू केली आहे. समाजातील हुंडा प्रथा बंद व्हायला तयार नाही, लग्नासाठी मुली मिळत नसल्या, तरी हुंडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे स्वरूप बदलले असून, पैशांऐवजी आता सोने, गाडी, बंगला अशा अपेक्षा वधुपित्यांकडून केल्या जात आहेत. त्यावर लगाम घालणे कठीण आहे. पण, प्रत्येकाने सामाजिक जाणिवेतून वधुपित्याला मदत करावी अन् तन-मन-धनाने त्याच्यासोबत राहावे. नक्कीच हुंडाबळी, बापाच्या आत्महत्या अन् कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी होतील.- राजेश पवार, आमदार नायगाव.

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्न