शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

"लेकीचं लग्न, पण खर्चाची चिंता नाही!"; गरीब वधुपित्यांना आमदार राजेश पवारांचा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:33 IST

‘चिंता मिटली, नवरी सजली!’; नायगावात आमदार राजेश पवारांचा अनोखा उपक्रम चर्चेत

नांदेड : केवळ फोटो सेशनपुरते कार्य नको, तर प्रत्येक गोरगरिबापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी नायगाव मतदारसंघात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. विशेष म्हणजे उपवधूंच्या पित्यांना मुलींच्या लग्नासाठी हातभार लावणारी अफलातून योजना आमदार राजेश पवार हे त्यांच्या स्वखर्चातून मतदारसंघात राबवित आहेत. लेकीच्या सप्तपदीसाठी बापाला हातभार लावणाऱ्या या योजनेची नांदेडातच नव्हे, तर राज्यात चर्चा होत आहे.

पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले. वैष्णवी हगवणे हीच्या आत्महत्येनंतर पुणे, अहिल्यानगर आदी ठिकाणच्या मराठा समाजाने लग्नांसाठी एक आचारसंहिता घालून दिली. त्यातून वधुपित्याचा होणारा अनाठायी खर्च टाळला जावा हा उद्दात्त हेतू आहे. परंतु, कोणत्याही पित्याला आपल्या मुलीच्या लग्नात जेवणावळी उठवाव्या वाटतात अन् लेकीचे लग्न थाटामाटात करावे वाटते. मात्र, त्यासाठी कर्ज काढणे अथवा जमीन, घर विक्री करून हा बडेजाव करणे चुकीचेच आहे. पण, अशा गोरगरीब अन् गरजू वधुपित्यांसाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी ‘चिंता मिटली, नवरी सजली!’ या संकल्पनेतून स्वखर्चातून एक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

सप्तपदीसाठी माझा हातभार... एक भाऊ म्हणून आमदार पवार यांचा हा छोटासा प्रयत्न अनेक बापांचे प्राण वाचविणारा अन् लेकीचे स्वप्न पूर्ण करणारा ठरत आहेत. मुलीच्या लग्नासाठी स्वखर्चातून आर्थिक मदत देणारी ही योजना मुलीचा पाठीराखा भाऊ, म्हणून चर्चेत आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ४ ते ६ लग्न एकत्र करणाऱ्यांना मंडप, जेवण किंवा भांडी यातील कोणताही एक पूर्ण खर्च, तसेच ७ ते १२ लग्न एकत्र होणार असतील तर मंडप आणि जेवणावळी असा दोन्हीचा संपूर्ण खर्च आमदार पवार स्वत: उचलणार आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात नायगाव मतदारसंघातील किमान २ मुलींचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यांनी सामाजिक जाणिवेतून सुरू केलेल्या या योजनेचे वधुपित्यांसह समाजातून स्वागत होत आहे.

सामाजिक बांधिलकीतून उपक्रमलोकप्रतिनिधी म्हणून लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर अनेक गरीब पित्यांकडून केला जाणारा खर्च पाहवत नाही. अनेकजण लेकीच्या प्रेमापोटी व्याजाने पैसे काढून, जमीन विक्री करून लग्न करतात. त्यामुळे उद्या या बापाचे काय होणार? असा विचार करून मन विचलित होते. त्यातूनच एक भाऊ या नात्याने मतदारसंघातील मुलींच्या लग्नाला छोटीशी मदत म्हणून ‘चिंता मिटली, नवरी सजली!’ या संकल्पनेतून एक योजना स्वखर्चातून सुरू केली आहे. समाजातील हुंडा प्रथा बंद व्हायला तयार नाही, लग्नासाठी मुली मिळत नसल्या, तरी हुंडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे स्वरूप बदलले असून, पैशांऐवजी आता सोने, गाडी, बंगला अशा अपेक्षा वधुपित्यांकडून केल्या जात आहेत. त्यावर लगाम घालणे कठीण आहे. पण, प्रत्येकाने सामाजिक जाणिवेतून वधुपित्याला मदत करावी अन् तन-मन-धनाने त्याच्यासोबत राहावे. नक्कीच हुंडाबळी, बापाच्या आत्महत्या अन् कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी होतील.- राजेश पवार, आमदार नायगाव.

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्न