शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बिलोली शहरासह ग्रामीण भागातील ओसाड विहिरी बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:53 IST

तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे.

ठळक मुद्देविहिरींवर लोखंडी पिंजरे टाकणे गरजेचे

बिलोली : तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. परिणामी, ओसाड पडलेल्या विहिरी लहान मुले तथा मोकाट गुराढोरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरत आहेत. त्या ओसाड विहिरीवर स्थानिक प्रशासनाने लोखंडी पिंजरे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.३० ते ३५ वर्षांआधी पाण्याच्या दृष्टीने घरोघरी विहिरी खोदल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जनतेचे हित जोपासून ग्रामीण तथा शहरी भागात विहिरींची निर्मिती प्रशासनाने केली होती. त्यामुळे ज्याच्या घरी विहिरी नव्हत्या, त्यांना सार्वजनिक ठिकाणच्या विहिरींवरुन पाणी भरणे सोपे जात होते. पाणी भरण्याच्या दृष्टीने नागरिकांना विहिरींचे अनन्यसाधारण महत्त्व होते.परंतु, दिवसेंदिवस विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेल्याने ग्रामीण तथा शहरी भागात बोअरवेलची निर्मिती करण्यात आली. त्याद्वारे पिण्याचे पाणी सार्वजनिक नळ तसेच घरगुती नळाद्वारे पोहोचविणे शक्य झाले. त्यामुळे सर्वात आधी घरगुती विहिरी पूर्णपणे आटल्याने त्या माती अथवा स्लब टाकून बुजविण्यात आल्या. परंतु, ग्रामीण तथा शहरी भागात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ओसाड विहिरी अजूनही उघड्याच आहेत. त्यावर कोणत्याच प्रकारचे लोखंडी पिंजरे नसल्याने मोकाट जनावरे, लहान मुलांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत. धार्मिक सण जसे पतंग उत्सवात मुले पतंग उडवताना तसेच खेळताना इतके मग्न होतात की, पतंगाच्या मागे लागल्याने या ओसाड विहिरींचे शिकार बनतात.या ओसाड विहिरी अतिशय जुन्या असल्याने काठ पूर्णपणे ढासाळले आहेत. परिणामी मुले, जनावरे त्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण तथा शहरी भागातील ओसाड विहिरी ज्या प्रशासनाच्या अंतर्गत येतात त्यावर त्यांनी लोखंडी पिंजरे टाकण्याची मागणी ग्रामीण व शहरी भागातून होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी