शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 10:51 IST

आंधळ्या या सरकारला जनता दिसत नसल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.

नांदेड : शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून भाजपच्यावतीने मंगळवारी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. तर नांदेड येथे झालेल्या आंदोलनात उपस्थितीत असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर यावेळी निशाणा साधला. तर सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला, असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

दानवे म्हणाले की, राज्यातील महाआघाडीचे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. यामध्ये तु मोठा की मी मोठा यावरूनच वाद सुरु आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही. परंतु एकमेकांच्या पायात पाय अडकून ते पडले तर आम्हाला दोष देवू नका, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगाविला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुक निकालानंतर शिवसेनेच्या मनात पाप आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांनी बांधावर जावून हेक्टरी २५ हजार रुपये मिळाले पाहिजेत अशी घोषणा केली होती. परंतु त्यांना आपल्याच घोषणेचा विसर पडला आहे. या सरकारने गेल्या चार महिन्यात नवीन काही केले नाही. फक्त आमच्या सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देण्याचे काम मात्र अग्रमक्रमाने केले, असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

तर मराठवाड्यासाठी संजीवनी ठरणारी वॉटरग्रीड योजनाही बंद करण्याच्या तयारीत हे सरकार आहे. मुंबईतील मेट्रो, कोस्टल रोड ही कामे आम्ही सुरु केली. परंतु सरकारने त्यामध्ये खीळ घालण्याचा प्रयल केला आहे. भाजपाच्या काळात केंद्राने कापूसाची नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने स्वताहाच्या तिजोरीतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला आहे. आंधळ्या या सरकारला जनता दिसत नसल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.