शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला : रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 10:51 IST

आंधळ्या या सरकारला जनता दिसत नसल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.

नांदेड : शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून भाजपच्यावतीने मंगळवारी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. तर नांदेड येथे झालेल्या आंदोलनात उपस्थितीत असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर यावेळी निशाणा साधला. तर सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला, असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

दानवे म्हणाले की, राज्यातील महाआघाडीचे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. यामध्ये तु मोठा की मी मोठा यावरूनच वाद सुरु आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही. परंतु एकमेकांच्या पायात पाय अडकून ते पडले तर आम्हाला दोष देवू नका, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगाविला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुक निकालानंतर शिवसेनेच्या मनात पाप आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांनी बांधावर जावून हेक्टरी २५ हजार रुपये मिळाले पाहिजेत अशी घोषणा केली होती. परंतु त्यांना आपल्याच घोषणेचा विसर पडला आहे. या सरकारने गेल्या चार महिन्यात नवीन काही केले नाही. फक्त आमच्या सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देण्याचे काम मात्र अग्रमक्रमाने केले, असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

तर मराठवाड्यासाठी संजीवनी ठरणारी वॉटरग्रीड योजनाही बंद करण्याच्या तयारीत हे सरकार आहे. मुंबईतील मेट्रो, कोस्टल रोड ही कामे आम्ही सुरु केली. परंतु सरकारने त्यामध्ये खीळ घालण्याचा प्रयल केला आहे. भाजपाच्या काळात केंद्राने कापूसाची नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने स्वताहाच्या तिजोरीतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला आहे. आंधळ्या या सरकारला जनता दिसत नसल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.