शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

coronavirus : नांदेड जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरळीत होणार-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:05 IST

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

ठळक मुद्देमंगळवारी दिली जाणार याबाबतची अधिक माहिती

नांदेड : कोरोना संकटाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचवेळी आर्थिक घडीही सुरळीत करण्यासाठी आता शहर व जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून टप्याटप्याने कोण-कोणते व्यवहार करता येतील, याबाबत मंगळवारी विस्तृत माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सोमवारी झूम अ‍ॅपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी म्हणाले,  जिल्ह्यात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले आहेत. यातील ३६ रुग्ण हे श्री लंगर साहिब गुरुद्वारातील आहेत. उर्वरीत रुग्ण शहरातील इतर भाग तसेच माहूर तालुक्यातील एका रुग्णाचाही समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्या ही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. पण त्याचवेळी औरंगाबाद, यवतमाळ, लातूर, परभणी सारख्या जिल्ह्यानेही आपले व्यवहार काही प्रमाणात सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील व्यवहारही सुरू केले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. 

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. हे व्यवहार सकाळी ७ ते १ किंवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील हेही स्पष्ट केले जाणार आहे.  शहरातील बॅरीकेटींग काढण्यात येत आहे. ही बॅरीकेटींग आता आवश्यक ठिकाणीच ठेवली जाणार आहे. काही ठिकाणची काढली जाईल तर काही ठिकाणी नव्यानेही बॅरीकेटींग करावी लागेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

श्री लंगर साहिब गुरुद्वारा येथील अडकलेले भाविक व तेथील कर्मचारी यांची तपासणी केली जात आहे. या सर्व प्रक्रियेत लंगर साहिब गुरुद्वाराकडून आवश्यक ते सहकार्य केले जात असल्याचेही ते म्हणाले. लंगर साहिब प्रशासनाला नोटीसचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांनीही शहरातील परिस्थितीबाबत माहिती दिली. प्रशासनाच्या तसेच महापालिकेच्या सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना रुग्णांना आता दहा दिवसात सुट्टीएखाद्या रुग्णाचा रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्याला दहा दिवस उपचार दिले जाणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह येताच त्याला रुग्णालयात १४ दिवस क्वॉरन्टाईन ठेवले जात होते. मात्र शासनाच्या नव्या सुचनानुसार निगेटीव्ह रुग्णांना आता दहा दिवसानंतर घरी सोडले जाईल. मात्र त्यांना होम क्वॉरन्टाईन राहण्याच सल्ला दिला जाणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड