शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुस्तके परत करण्यास कोरोनाचा अडथळा, नवीन पुस्तके आल्यास जुने परत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:17 IST

विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत जि.प. शाळेत शिक्षण ...

विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या १ लाख ९६ हजार ८१५ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ देण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून ठेवतात. त्यानुसार अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करण्यात येणार आहे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदांची बचत होऊन पर्यावरणाची हानी टाळता येणार आहे. गतवर्षी शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळेत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्या शाळांमधील विद्यार्थी, पालकांनी २०१९-२० व २०२०-२०२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे. त्यानुसार काही शाळेवर पुस्तके जमा करण्यात आली आहेत. मात्र कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असल्याने या कामात अडथळा निर्माण होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. अशा वेळी शाळेवर जाऊन पुस्तके परत करण्यास विद्यार्थी व पालक भीत आहेत. मात्र पुढील शैक्षणिक सुरू होण्यापूर्वी जुनी पुस्तके मोठ्या संख्येने विद्यार्थी परत करतील, अशी माहिती शिक्षणविस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी दिली.

चौकट- जनजागृतीची गरज

पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी मोफत पुस्तके मिळत असल्यामुळे अनेक पालकांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे शिक्षण विभागाने पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.

चौकट- शासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे पुस्तके परत मागवली जात आहेत. त्यासंबंधीचे पत्रही पाठवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काही पालकांनी मागील वर्षीचे पुस्तके शाळांमध्ये जमा केले आहेत. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तके वाटप करताना जुनी पुस्तके मोठ्या प्रमाणात संकलित होतील. जुनी पुस्तके परत केल्यासच पुढच्या वर्गातील नवीन पुस्तके मिळतील. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि.प. नांदेड.