शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 15:05 IST

बाजारसमिती परिसरात संचारबंदीने शुकशुकाट

ठळक मुद्देग्रामीण भागात भीतीचे वातावरण: शेतकऱ्यांचा भाजीपाला सडतोय शेतातचशासनाच्या नियोजनाची गरज

नांदेड : जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसापासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परिणामी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सर्व व्यवहार 20 मार्च पासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात 13 मार्च पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे आणि त्यानंतर शासनाने संचारबंदी लागू केली. जिल्हा सीमा बंद करण्याच्या सूचना केल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेता आणि ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातून शहरात यायला कोणी हिंमत करत नाही. त्यामुळेच भाजीपाला आणि दूध, गहू आदी मालाची आवक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनाही सहन करावा लागत आहे.  बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला शेतातच सडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचा फटका शहरी भागातील जनतेनेलाही सहन करावा लागत आहे. काही भाजीपाला विक्रेते आपल्याकडे उपलब्ध असलेला भाजीपाला चढ्या भावाने विक्री करत आहेत तसेच पुढे किती दिवस बंद राहील अशी भीती ग्राहकांना घालून जो माल उपलब्ध आहे तो त्यांच्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून कोणीही भाजीपाला घेत नसल्याचे कारण देत भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने भाजीपाला घेत आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा अनेक भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या गावात भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. त्यांची बैठक घेऊन सदर माल संबंधित बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या व्यावसायिकांवर शासनाने  कारवाई करावी तसेच शेतमाल उत्पादन करणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी त्याच बरोबर त्यांना पोलीस प्रशासनाकडून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि ग्रामसेवक, सरपंच यांना सूचना देऊन भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य, मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी डॉ विठ्ठलराव विखे- पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती