शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Corona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 15:05 IST

बाजारसमिती परिसरात संचारबंदीने शुकशुकाट

ठळक मुद्देग्रामीण भागात भीतीचे वातावरण: शेतकऱ्यांचा भाजीपाला सडतोय शेतातचशासनाच्या नियोजनाची गरज

नांदेड : जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसापासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परिणामी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सर्व व्यवहार 20 मार्च पासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात 13 मार्च पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे आणि त्यानंतर शासनाने संचारबंदी लागू केली. जिल्हा सीमा बंद करण्याच्या सूचना केल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेता आणि ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातून शहरात यायला कोणी हिंमत करत नाही. त्यामुळेच भाजीपाला आणि दूध, गहू आदी मालाची आवक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनाही सहन करावा लागत आहे.  बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला शेतातच सडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचा फटका शहरी भागातील जनतेनेलाही सहन करावा लागत आहे. काही भाजीपाला विक्रेते आपल्याकडे उपलब्ध असलेला भाजीपाला चढ्या भावाने विक्री करत आहेत तसेच पुढे किती दिवस बंद राहील अशी भीती ग्राहकांना घालून जो माल उपलब्ध आहे तो त्यांच्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून कोणीही भाजीपाला घेत नसल्याचे कारण देत भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने भाजीपाला घेत आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा अनेक भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या गावात भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. त्यांची बैठक घेऊन सदर माल संबंधित बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या व्यावसायिकांवर शासनाने  कारवाई करावी तसेच शेतमाल उत्पादन करणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी त्याच बरोबर त्यांना पोलीस प्रशासनाकडून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि ग्रामसेवक, सरपंच यांना सूचना देऊन भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य, मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी डॉ विठ्ठलराव विखे- पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती