शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनाच्या महामारीतही मद्यपींनी रिचविली ५४ लाख लिटर दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:42 IST

लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील मद्यपींनी देशी अन् विदेशी मिळून तब्बल ५४ लाख ४८ हजार लिटर दारू ढोसली आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दारूविक्रीला परवानगी देण्यात आलीराज्य शासनाला दारू विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

नांदेड : कोरोना महामारीत सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. परंतु, त्याचा मद्यपींवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील मद्यपींनी देशी अन् विदेशी मिळून तब्बल ५४ लाख ४८ हजार लिटर दारू ढोसली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असली तरी जवळपास तीन महिने कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे ही विक्री दोन ते अडीच महिन्यांतीलच आहे. 

कोरोना महामारीने जगाला हैराण केले आहे. अद्याप कोरोनावर लस मिळाली नसून आतातर कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला. या काळात सर्वच व्यवहार बंद होते. लोकांच्या हातालाही काम नव्हते. दारूची दुकानेही बंद होती. परंतु लपूनछपून विक्री सुरूच होती. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दारूविक्रीला परवानगी देण्यात आली. त्यासाठी राज्याच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचे कारण देण्यात आले.

 

सुरूवातीला काही तास दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे नंतर दिवसभर दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यात एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत नांदेड जिल्ह्यात तब्बल ५४ लाख ४८ हजार ४२० लिटर देशी अन विदेशी दारूची विक्री झाली. त्यामध्ये ९ लाख १४ हजार ४९९ लिटर विदेशी तर ४५ लाख ७१ हजार ९२१ लिटर देशी दारू मद्यपींनी ढोसली. तर ८ लाख १९८४ लिटर बियर आणि ३ हजार २४७ लिटर वाईनची विक्री करण्यात आली.

गतवर्षीच्या तुलनेत विदेशी २७.७६ तर देशी दारूच्या विक्रीत २१.८० लिटर घट झाली आहे. वाईनच्या विक्रीत मात्र ७.१० टक्के वाढ झाली आहे. महसूल मिळण्याचे इतर सर्व मार्ग बंद झालेल्या राज्य शासनाला दारू विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 54 लाख लिटर दारू लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत ढोसली आहे. गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी कमी असली तरी जवळपास तीन महिने कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे ही विक्री दोन ते अडीच महिन्यातीलच आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दारूविक्रीला परवानगी दिली.

टॅग्स :NandedनांदेडRevenue Departmentमहसूल विभागCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक