शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:41 IST

जलजन्य आजाराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात २५ टक्के असल्याची बाब मार्च अखेरच्या तिमाही अहवालात पुढे आली आहे. नांदेड शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण केवळ २.७० टक्के दर्शविण्यात आले आहे. वास्तवात हे प्रमाण अधिक आहे. जुन्या नांदेडसह शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देतिमाही अहवाल : नांदेडमध्ये केवळ २.७० टक्के दुषित पाण्याचे प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जलजन्य आजाराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात २५ टक्के असल्याची बाब मार्च अखेरच्या तिमाही अहवालात पुढे आली आहे. नांदेड शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण केवळ २.७० टक्के दर्शविण्यात आले आहे. वास्तवात हे प्रमाण अधिक आहे. जुन्या नांदेडसह शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पाणीनमुने तपासणीसाठी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळेकडे पाठविले होते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च १८ या तिमाहीचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात १९.४१ टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब पुढे आली आहे. जानेवारी महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ४८७ पाणीनमुने घेतले होते. त्यातील २८० नमुने दुषित आढळले. हे प्रमाण १८.८३ टक्के इतके आहे. फेब्रुवारीमध्ये १४०७ नमुने त्यापैकी २८२ दूषित आढळले. २०.६ टक्के प्रमाण दूषित होते. मार्च १८ मध्येही १ हजार ४६० पाणीनमुने घेण्यात आले. त्यापैकी २८३ नमुने दूषित निघाले. १८.३८ टक्के पाणीनमुने दूषित आढळले आहेत, तर जिल्ह्यात तीन महिन्यांत ४ हजार ३५३ पैकी ८४५ पाणीनमुने दूषित आढळले. हे प्रमाण १९.४१ टक्के आहे.या दूषित प्रमाणामध्ये सर्वाधिक दूषित नमुने हे ग्रामीण भागातील आढळले आहेत. ग्रामीण भागात घेतलेल्या २ हजार ९७८ नमुन्यांपैकी ७५१ पाणीनमुने दूषित आढळले. २५.२१ टक्के पाणीपुरवठा दूषित असल्याची बाब या अहवालातून स्पष्ट होत आहे. नागरी भागातही ९.५ टक्के पाणीपुरवठा दूषित होत आहे. नगरपालिका क्षेत्रातील घेतलेल्या ८९५ पाणीनमुन्यांपैकी ८१ पाणी नमुनेही दूषित आढळले आहेत.जिल्ह्यात टीसीएल नमुने तपासणीमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ४४ नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ग्रामीण भागात १० ठिकाणी २० टक्क्यांपेक्षा क्लोरीनचे प्रमाण कमी आढळले. शहरी भागातही क्लोरीनची कमतरता तीन ठिकाणी आढळली.महापालिका हद्दीत जानेवारी ते मार्च १८ या कालावधीत ४८० पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांपैकी १३ नमुने दूषित आढळले. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार नांदेड शहरात केवळ २.७० टक्के दूषित पाणीपुरवठा होतो. या तिमाहीत घेतलेल्या नमुन्यांपैकी १६० नमुने हे जानेवारी १८ मध्ये घेण्यात आले होते. त्यापैकी १३ ठिकाणचे नमुने दूषित आढळले; पण विशेष म्हणजे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या प्रत्येकी १६० नमुन्यांपैकी एकही नमुना दूषित आढळला नाही. त्यामुळे शहरात दोन महिने शुद्ध पाणीपुरवठा झाल्याचे हा अहवाल सांगतो. पण प्रत्यक्षात नांदेड शहरातील अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी मागील सहा महिन्यांपासून येत आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण