शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उमरी येथे तक्रार निवारण बैठकीत महावितरणविरुद्ध ग्राहकांनी वाचला तक्रारींचा पाढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 16:55 IST

तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़ सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले.

ठळक मुद्देआ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या तक्रार निवारणाची बैठक पार पडली़ आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या तक्रार निवारणाची बैठक पार पडली़

उमरी (नांदेड ) : महावितरणच्या तक्रार निवारण बैठकीत तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़. यावेळी सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले. आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या तक्रार निवारणाची बैठक पार पडली़ कार्यकारी अभियंता एम़एम़ गोपुलवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता शेख अब्दुल्ला, कनिष्ठ अभियंता सुनील कासनाळे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

डीपी जळाल्यावर शेतक-यांना स्वत:च्या खर्चाने डीपी आणावी लागते. त्यासाठी महावितरणचे कर्मचारी पैेसे जमा करतात, हा कोणता नियम आहे? असा प्रश्न कैैलास कुदळेकर यांनी केला़ सावरगाव येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी पोल रोवले़ आजपावेतो येथे तारा ओढल्या नाहीत व वीजजोडणी दिली नाही़ नवनवीन योजना दाखविण्यात येतात, मात्र प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याची खंत सरपंच बुक्तरे यांनी व्यक्त केली़ डीपी जळाल्यावर किती तासात नवीन डीपी बसविणार? भारनियमनाव्यतिरिक्त किती वेळ वीज देणार याचे लेखी उत्तर देण्याची मागणी नागेश सबनेडवार यांनी केली़ 

कृषीपंपाला सरासरी वार्षिक बिल आकारणी होते़ छोट्या शेतक-यांची यामुळे आर्थिक पिळवणूक होते म्हणून कृषीपंपाला मीटर बसविण्याची मागणी यावेळी अनेक शेतक-यांनी केली़ कारला येथे १५ दिवसापूर्वी डीपी काढून नेला, अद्याप बसविला नाही़, अशी तक्रार मोहनराव पवळे यांनी केली़ अस्वलदरी येथे वीज पुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा बंद झाला़ इज्जतगाव पट्टी येथे १३ महिन्यापूर्वी कोेटेशन भरूनही वीज जोडणी दिली नाही़ दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी, दलित वस्तीसाठी अशा योजना जाहीर होतात, मात्र प्रत्यक्षात कसलाच फायदा नाही़ कारण तीन महिन्यापूर्वी ढोलउमरी येथील डीआरडी ग्राहकांसाठी अर्ज भरून वीज जोडणीची मागणी केली़ मात्र कसलीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार सरपंच येरावाड यांनी केली़ 

कळगाव येथे तारा खाली लोंबकळत असल्याने जिवितास धोका निर्माण झाला़ येथे विजेच्या शॉकमुळे गाय ठार झाली, अशी तक्रार बाालजी डांगे यांनी केली़ यावेळी समारोपाच्या भाषणात आ़वसंतराव चव्हाण यांनी अधिकारी व अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले़ १०० पैेकी २०-२५ लोकांच्या समस्यांचे निरसन होणे अपेक्षित आहे़ मात्र काहीच होत नाही, ही गंभीर बाब होय़ लोकांना उत्तरे द्यावीच लागतील़ दलित वस्ती, पुनर्वसित गावे, कृषीपंप आदींच्या मोठ्या तक्रारी आहेत़ लोकांचा अंत पाहू नका, वेळेवर दुरस्ती करून सेवा द्या, घोषित केलयाप्रमाणे निदान आठ तास तरी वीज द्या, उमरी तालुक्यासाठी किती ट्रान्सफार्मर आले, किती बसविले याची पूर्ण माहिती देण्याची सूचना आ़ चव्हाण यांनी केली़ 

कार्यकारी अभियंता गोपुलवाड यांनी येत्या मार्चच्या आत मीटर कनेक्शन देण्यात येतील व दारिद्रयरेषेखालील ग्राहकांना २ रुपये कोटेशनमध्ये वीज जोडणी देण्याची योजना असल्याचे सांगितले़ यावेळी आनंदराव यलमगोंडे, बालाजीराव जाधव, पं़स़ सदस्य चक्रधर गुंडेवार, प्रकाश पाटील चिंचाळकर, संजय कुलकर्णी, मोहनराव देशमुख, किशोर पबितवार, पांडुरंग पुदलवाड, एम़एम़ चंदापुरे, माधवराव बोळसेकर, बापुसाहेब येताळे, दिगांबर सावंत, ज्ञानेश्वर सरसे आदींसह असंख्य शेतकरी ग्राहकांची यावेळी उपस्थिती होती़ दिगंबर कदम यांनी सूत्रसंचालन केले तर सहाय्यक कार्यकारी अभियंता शेख अब्दुला यांनी आभार मानले़ 

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेडFarmerशेतकरी