शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

बांधकाम साहित्याने रस्ते व्यापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:17 AM

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया ...

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण

देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया बंद आहे. यामागे कोरोनाचे कारण सांगितले जाते. शहरातील विविध भागात नागरिक फिरून चौकशी करतात. मात्र केंद्र बंद असल्याने लोकांची अडचण होत आहे.

फूल उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका

मुदखेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरासह तालुक्यात फूल शेती करणाऱ्या जवळपास ८०ते १००फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने फुले विक्रीसाठी नेता येत नसल्याने जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. फूल उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बँकेतील गर्दी कमी होईना

कंधार - मागील महिन्यात तब्बल १० दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून पुन्हा ठरावीक वेळेत बँका सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या दरम्यान कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

खरिपाची तयारी सुरू

उमरी - तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मास्क विक्रीतून रोजगार

भोकर - शहरात मास्कची मागणी वाढली असून अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या हाताला काम नसल्याने या विक्रेत्यांनी मास्क खरेदी करून शहरातील विविध भागात स्टॉल्स लावले आहेत.

जागेच्या वादातून मारहाण

नायगाव - तालुक्यातील निळगव्हाण येथील भारतबाई गागलवाड यांना जागेच्या वादातून आरोपींनी मारहाण केल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये भारतबाई यांच्या डोक्याला मार लागला असून आरोपींनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. नायगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

बियाणांची चढ्या दराने विक्री

बिलोली - येथील बाजारपेठेत बियाणांची चढ्या दराने विक्री केली जात आहे. शेतकरी मशागत करून खरीप हंगामाची तयारी करीत असून बी-बियाणे, खतांच्या खरेदीचे नियोजनही करत आहेत. मात्र काही व्यापाऱ्यांनी आतापासूनच चढ्या दराने विक्री करणे सुरू केले असून यामुळे शेतकरी लुबाडला जात आहे.

गटई कामगारांना मदत द्या

नायगाव - लॉकडाऊनच्या काळात चर्मकार समाजातील गटई कामगारांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. राज्यातील गटई कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे यांनी केली. यानिमित्ताने उपोषणही करण्यात आले. यावेळी बंटी नायगावकर, संतोष सूर्यवंशी, गजानन गंगासागरे, चंद्रकांत हवेलीकर, देवानंद गंगासागरे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक विहिरीची दुरावस्था

कंधार - उस्माननगर येथील वाॅर्ड ३ व २ मधील गवळी गल्ली भागातील सार्वजनिक विहिरीची दयनीय अवस्था झाली. निजामकालीन विहीर आहे. विहिरीची उंची व रस्ता बरोबर झाल्याने अनेक दुर्घटना होत आहेत. डुक्कर, शेळी विहिरीमध्ये पडून जखमी झाले आहेत. या विहिरीचे पाणी धुणी, भांडीसाठी वापरले जाते. पावसाळा-हिवाळ्यात भरपूर पाणी असते.

तीरकमटे यांना पीएच.डी.

देगलूर - आडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्रातील विद्यार्थी एन.टी. तीरकमटे यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.बी.आर. कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान विशेष संदर्भ लातूर जिल्हा या विषयावर संशोधन पूर्ण केले. याबद्दल त्यांना पीएच.डी. देण्यात आली.

पिकांचे पंचनामे करा

किनवट - वादळी वारे आणि पावसामुळे दोन दिवसापूर्वी पिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड यांनी केली. शिवणी परिसरातील नुकसानीकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याचेही त्यांनी नमूद केले.

गव्हाचे भाव वाढले

हदगाव - मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे भाव २०० ते २५० रुपये वाढले आहेत. यंदा २४०० ते २२०० रुपयांपर्यंत गहू विक्री होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी भाववाढ करीत असल्याचे दिसून येते.

रस्त्यावर शुकशुकाट

नायगाव - लॉकडाऊनमुळे कृृष्णूर परिसरातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. सकाळी ७ ते ११ दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी रस्त्यावर तुरळक गर्दी आहे. ऊन व लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसते.

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री

नांदेड - येथील रेल्वे स्टेशनसमोर उघड्यावरच खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे डासांसह माशांचाही प्रादुर्भाव वाढला. कोणतीही सुरक्षा बाळगली जात नाही. याशिवाय बसेसही धावत असल्यामुळे रस्त्यावरील धूळ खाद्यपदार्थांवर उडत आहे. संबंधित याकडे दुर्लक्ष करीत आहेत.