शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:43 IST

भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देसत्ता संपादन मेळावा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

नांदेड : भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा शहरातील नवामोंढा मैदानावर घेण्यात आला. यावेळी ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख असुदोद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती होती.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘आरएसएस’चा देशात छुपा अजेंडा राबविला जात आहे. सांस्कृतिक राष्टवाद या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. ‘आरएसएस’चा सांस्कृतिक राष्टवाद नेमका काय आहे, हे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे. या विषयावर आपण जाहीर चर्चा करायला तयार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. सांस्कृतिक संघटनेविरुद्ध लढा देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. २०२२ मध्ये भाजपा संविधानात बदल करुन भारतीय घटनेने दिलेला मताचा अधिकार काढून जातीच्या नावाने कुबड्या उभे करण्याचे काम करत आहे. त्यामुळे आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.देशात आज मुस्लिमांना भाजपाने वंचित केले आहे. तर ओबीसींना काँग्रेस वंचित करत आहे. आघाडीसाठी ‘एमआयएम’चा मुद्दा पुढे आणला जात असला तरी काँग्रेस खऱ्या अर्थाने ओबीसींना सत्तेपासून दूर ठेवू पाहत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना सत्तेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न काँग्रेसला नको असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख खा. ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना उत्तर प्रदेशात काँग्रेसला सपा-बसपाने आघाडीत घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने तेथे ८० जागा लढविण्याची भूमिका घेतली आहे. ‘एमआयएम’ही राज्यात ४८ जागा लढवू शकली असती. मात्र ‘एमआयएम’ने संविधान वाचविण्यासाठी घेतलेली ही भूमिका खूप मोठी असल्याचे ते म्हणाले.खा. ओवेसी यांनी मुस्लिम समाज काँग्रेसच्या भूलथापांना आणखी किती दिवस बळी पडणार आहे ? असा सवाल केला. भाजपाच्या हिंदू राष्टवादावरही त्यांनी टीका केली. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विषय बाजूलाच पडला आहे. पण पुढील काळात ‘वोट हमारा, राज हमारा’ अशी रणनिती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेवरही ओवेसी यांनी टीका करताना सकाळी भाईभाई, रात्री दुश्मन-दुश्मन तर कधी रात्री भाईभाई, सकाळी दुश्मन-दुश्मन, अशी भूमीका सेनेची असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर सेना सत्तेपासून दूर व्हायचे की नाही हे ठरवेल, असेही ते म्हणाले. ओबीसींनीही आता सेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. राज्यात अनेक घोटाळे झाले. पण अटक केवळ छगन भुजबळ यांना झाली. पवारांचा पुतण्या काय ‘धुतल्या तांदळासारखा होता ?’ असा सवालही ओवेसी यांनी केला.आ. इम्तीयाज जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकरांचे सत्ता संपादनाचे स्वप्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. ओवेसी हे पूर्ण करीत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. आंबेडकर आणि खा. ओवेसी यांच्याबाबत अनेक चर्चा केली जात आहे. मात्र ते आज एका मंचावर आहेत हे सर्वांनी पहावे, असेही ते म्हणाले.सभेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फेरोज लाला, रामचंद्र भरांडे, प्रा. यशपाल भिंगे, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, पक्षाचे महासचिव अमित भुईगळ, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी आ. हरिभाऊ भदे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कु-हे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्रा. विकास कदम यांनी मानले. मोठ्या संख्येने यावेळी जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :NandedनांदेडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेस