शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:43 IST

भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देसत्ता संपादन मेळावा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

नांदेड : भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा शहरातील नवामोंढा मैदानावर घेण्यात आला. यावेळी ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख असुदोद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती होती.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘आरएसएस’चा देशात छुपा अजेंडा राबविला जात आहे. सांस्कृतिक राष्टवाद या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. ‘आरएसएस’चा सांस्कृतिक राष्टवाद नेमका काय आहे, हे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे. या विषयावर आपण जाहीर चर्चा करायला तयार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. सांस्कृतिक संघटनेविरुद्ध लढा देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. २०२२ मध्ये भाजपा संविधानात बदल करुन भारतीय घटनेने दिलेला मताचा अधिकार काढून जातीच्या नावाने कुबड्या उभे करण्याचे काम करत आहे. त्यामुळे आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.देशात आज मुस्लिमांना भाजपाने वंचित केले आहे. तर ओबीसींना काँग्रेस वंचित करत आहे. आघाडीसाठी ‘एमआयएम’चा मुद्दा पुढे आणला जात असला तरी काँग्रेस खऱ्या अर्थाने ओबीसींना सत्तेपासून दूर ठेवू पाहत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना सत्तेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न काँग्रेसला नको असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख खा. ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना उत्तर प्रदेशात काँग्रेसला सपा-बसपाने आघाडीत घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने तेथे ८० जागा लढविण्याची भूमिका घेतली आहे. ‘एमआयएम’ही राज्यात ४८ जागा लढवू शकली असती. मात्र ‘एमआयएम’ने संविधान वाचविण्यासाठी घेतलेली ही भूमिका खूप मोठी असल्याचे ते म्हणाले.खा. ओवेसी यांनी मुस्लिम समाज काँग्रेसच्या भूलथापांना आणखी किती दिवस बळी पडणार आहे ? असा सवाल केला. भाजपाच्या हिंदू राष्टवादावरही त्यांनी टीका केली. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विषय बाजूलाच पडला आहे. पण पुढील काळात ‘वोट हमारा, राज हमारा’ अशी रणनिती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेवरही ओवेसी यांनी टीका करताना सकाळी भाईभाई, रात्री दुश्मन-दुश्मन तर कधी रात्री भाईभाई, सकाळी दुश्मन-दुश्मन, अशी भूमीका सेनेची असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर सेना सत्तेपासून दूर व्हायचे की नाही हे ठरवेल, असेही ते म्हणाले. ओबीसींनीही आता सेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. राज्यात अनेक घोटाळे झाले. पण अटक केवळ छगन भुजबळ यांना झाली. पवारांचा पुतण्या काय ‘धुतल्या तांदळासारखा होता ?’ असा सवालही ओवेसी यांनी केला.आ. इम्तीयाज जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकरांचे सत्ता संपादनाचे स्वप्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. ओवेसी हे पूर्ण करीत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. आंबेडकर आणि खा. ओवेसी यांच्याबाबत अनेक चर्चा केली जात आहे. मात्र ते आज एका मंचावर आहेत हे सर्वांनी पहावे, असेही ते म्हणाले.सभेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फेरोज लाला, रामचंद्र भरांडे, प्रा. यशपाल भिंगे, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, पक्षाचे महासचिव अमित भुईगळ, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी आ. हरिभाऊ भदे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कु-हे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्रा. विकास कदम यांनी मानले. मोठ्या संख्येने यावेळी जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :NandedनांदेडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेस