शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

By श्रीनिवास भोसले | Updated: November 9, 2024 16:31 IST

कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

- श्रीनिवास भोसलेनांदेड : काँग्रेसवाले देशामध्ये डॉ. बाबासाहेबांचे नाही तर त्यांचे स्वतंत्र संविधान चालवायाला पाहत आहेत. तसा प्रयत्न आणीबाणीमध्ये केला होता. आता वेगळे पुस्तक छापून संविधानाची थट्टा उडविण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला आहे. त्यांनी ७५ वर्ष दोन संविधान चालविण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी केले. ३७० ची भिंत उभारण्याचे काम त्यांनी केले. पण, आम्ही सत्तेत आल्यानंतर या कलमाला जमीनीत गाडण्याचे काम केले,असेही मोदी म्हणाले.

नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, मंत्री हेमंत पाटील, खासदार डॅा.अजित गोपछडे, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर, लोहा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आदींची उपस्थिती होती. 

दिल्लीत मोदी सरकार आले, पण या आनंदात नांदेडचे फुल नव्हते. त्यामुळे आता मी दिल्लीला नांदेडमधून कमळाचे फुल पाठविण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून मोदीसाठी ही मदत मागत असून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरियाणाच्या निवडणुकीत पहिल्यापेक्षा जास्त नाही तर इतिहासात सर्वाधिक जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठवाड्यावर सर्वाधिक अन्याय काँग्रेसवाल्यांनी केला आहे. परंतु, हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमी वैतरनेतून पाणी आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दमनगंगा, वैतरना, गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला लाभ होईल. त्यासाठी विविध सिंचन योजनांना मंजूरी दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात विविध उद्योग उभारण्यासाठी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हजारो युवकांच्या हातांना काम मिळले. 

मराठवाडा दुष्काळमुक्त होईलमराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे मुळ काँग्रेस असून त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या सुखदुखाची कधीच परवा केली नाही. मागील दहा वर्षात भाजप, महायुतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला. त्यातही अडीच वर्ष बिघाडी सरकारने या योजनांना ब्रेक लावण्याचे काम केले. आज नदी जोड प्रकल्प आणि मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त होईल तर ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून येथे हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकnanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणnanded-pcनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदी