शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा काँग्रेसला ‘फटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:02 AM

मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़

ठळक मुद्देमालेगाव सर्कल विश्लेषण अनेक महत्त्वाची पदे असतानाही काँग्रेसला मताधिक्य घेण्यात अपयश

शरद वाघमारे।नांदेड : मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़ विशेष म्हणजे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान सभापती, जि.प.सदस्य, कारखान्याचे संचालक यांच्या गावात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे़पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ व सध्याच्या भोकर मतदारसंघातील प्रचाराचा नारळ मालेगाव येथून फोडला जायचा. पूर्वी या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले. शिवाय मुख्यमंत्री व इतर पदे मिळाले.त्यांनीही आपला मतदार म्हणून या भागातील पप्पू पाटील कोंढेकर यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षाचे पद, बी. आर. कदम यांना बाजार समितीचे सभापती, माणिकराव इंगोले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यासारखी महत्त्वाची पदे दिली. शिवाय आजघडीला मालेगाव येथील संगीता अटकोरे यांना जि. प. सदस्य, उज्ज्वला इंगोले यांना महिला तालुका काँग्रेस, केशवराव इंगोले यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, रंगराव इंगोले यांना भाऊराव चव्हाण साखर कारखाना संचालक पद तर कामठा येथील मंगला स्वामी यांच्याकडे पंचायत समितीचे सभापतीपद आहे.मालेगाव सर्कलमधील काही गावांत महत्त्वाची पदे कार्यकर्त्यांना दिली आहेत. एवढी मोठी पदे असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना मात्र पदाधिकाऱ्यांच्या गावात समाधानकारक मतदान मिळू शकले नाही.लोकसभा निवडणुकीत मालेगाव सर्कलमधील मालेगाव, कोंढा, कामठा, गणपूर, देगाव कु, सावरगाव, देळूब, मेंढला, पिंपळगाव महादेव, शेलगाव, दाभड, गणपूर, उमरी, सावरगाव, धामदरी, सांगवी, खडकी ही गावे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात़ परंतु स्थानिक पातळीवर नेत्यांनी या निवडणुकीत मात्र मतदारांशी सुसंवाद साधला नसल्याचेच दिसून येत आहे.काँग्रेसची हक्काची मते भाजप, वंचित आघाडीलाप्रचार व निवडणुकीची जबाबदारी, वर्षानुवर्षे पदे या सर्व बाबी नागरिक व मतदार यांना खटकणाºया होत्या. या भागातील मतदारांना अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य होते. परंतु स्थानिक नेत्यांबद्दलचा असंतोष होता. या जुन्या नेत्यांना बदलून नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात संधी असावी अशी अपेक्षा होती. स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळेच भाजपा व वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसची हक्काची मते मिळाली़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर बदल करून नव्या पिढीच्या चेहºयाला संधी द्यावी, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

टॅग्स :Nandedनांदेड