शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा काँग्रेसला ‘फटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:04 IST

मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़

ठळक मुद्देमालेगाव सर्कल विश्लेषण अनेक महत्त्वाची पदे असतानाही काँग्रेसला मताधिक्य घेण्यात अपयश

शरद वाघमारे।नांदेड : मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़ विशेष म्हणजे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान सभापती, जि.प.सदस्य, कारखान्याचे संचालक यांच्या गावात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे़पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ व सध्याच्या भोकर मतदारसंघातील प्रचाराचा नारळ मालेगाव येथून फोडला जायचा. पूर्वी या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले. शिवाय मुख्यमंत्री व इतर पदे मिळाले.त्यांनीही आपला मतदार म्हणून या भागातील पप्पू पाटील कोंढेकर यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षाचे पद, बी. आर. कदम यांना बाजार समितीचे सभापती, माणिकराव इंगोले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यासारखी महत्त्वाची पदे दिली. शिवाय आजघडीला मालेगाव येथील संगीता अटकोरे यांना जि. प. सदस्य, उज्ज्वला इंगोले यांना महिला तालुका काँग्रेस, केशवराव इंगोले यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, रंगराव इंगोले यांना भाऊराव चव्हाण साखर कारखाना संचालक पद तर कामठा येथील मंगला स्वामी यांच्याकडे पंचायत समितीचे सभापतीपद आहे.मालेगाव सर्कलमधील काही गावांत महत्त्वाची पदे कार्यकर्त्यांना दिली आहेत. एवढी मोठी पदे असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना मात्र पदाधिकाऱ्यांच्या गावात समाधानकारक मतदान मिळू शकले नाही.लोकसभा निवडणुकीत मालेगाव सर्कलमधील मालेगाव, कोंढा, कामठा, गणपूर, देगाव कु, सावरगाव, देळूब, मेंढला, पिंपळगाव महादेव, शेलगाव, दाभड, गणपूर, उमरी, सावरगाव, धामदरी, सांगवी, खडकी ही गावे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात़ परंतु स्थानिक पातळीवर नेत्यांनी या निवडणुकीत मात्र मतदारांशी सुसंवाद साधला नसल्याचेच दिसून येत आहे.काँग्रेसची हक्काची मते भाजप, वंचित आघाडीलाप्रचार व निवडणुकीची जबाबदारी, वर्षानुवर्षे पदे या सर्व बाबी नागरिक व मतदार यांना खटकणाºया होत्या. या भागातील मतदारांना अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य होते. परंतु स्थानिक नेत्यांबद्दलचा असंतोष होता. या जुन्या नेत्यांना बदलून नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात संधी असावी अशी अपेक्षा होती. स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळेच भाजपा व वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसची हक्काची मते मिळाली़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर बदल करून नव्या पिढीच्या चेहºयाला संधी द्यावी, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

टॅग्स :Nandedनांदेड