शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा काँग्रेसला ‘फटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:04 IST

मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़

ठळक मुद्देमालेगाव सर्कल विश्लेषण अनेक महत्त्वाची पदे असतानाही काँग्रेसला मताधिक्य घेण्यात अपयश

शरद वाघमारे।नांदेड : मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़ विशेष म्हणजे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान सभापती, जि.प.सदस्य, कारखान्याचे संचालक यांच्या गावात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे़पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ व सध्याच्या भोकर मतदारसंघातील प्रचाराचा नारळ मालेगाव येथून फोडला जायचा. पूर्वी या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले. शिवाय मुख्यमंत्री व इतर पदे मिळाले.त्यांनीही आपला मतदार म्हणून या भागातील पप्पू पाटील कोंढेकर यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षाचे पद, बी. आर. कदम यांना बाजार समितीचे सभापती, माणिकराव इंगोले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यासारखी महत्त्वाची पदे दिली. शिवाय आजघडीला मालेगाव येथील संगीता अटकोरे यांना जि. प. सदस्य, उज्ज्वला इंगोले यांना महिला तालुका काँग्रेस, केशवराव इंगोले यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, रंगराव इंगोले यांना भाऊराव चव्हाण साखर कारखाना संचालक पद तर कामठा येथील मंगला स्वामी यांच्याकडे पंचायत समितीचे सभापतीपद आहे.मालेगाव सर्कलमधील काही गावांत महत्त्वाची पदे कार्यकर्त्यांना दिली आहेत. एवढी मोठी पदे असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना मात्र पदाधिकाऱ्यांच्या गावात समाधानकारक मतदान मिळू शकले नाही.लोकसभा निवडणुकीत मालेगाव सर्कलमधील मालेगाव, कोंढा, कामठा, गणपूर, देगाव कु, सावरगाव, देळूब, मेंढला, पिंपळगाव महादेव, शेलगाव, दाभड, गणपूर, उमरी, सावरगाव, धामदरी, सांगवी, खडकी ही गावे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात़ परंतु स्थानिक पातळीवर नेत्यांनी या निवडणुकीत मात्र मतदारांशी सुसंवाद साधला नसल्याचेच दिसून येत आहे.काँग्रेसची हक्काची मते भाजप, वंचित आघाडीलाप्रचार व निवडणुकीची जबाबदारी, वर्षानुवर्षे पदे या सर्व बाबी नागरिक व मतदार यांना खटकणाºया होत्या. या भागातील मतदारांना अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य होते. परंतु स्थानिक नेत्यांबद्दलचा असंतोष होता. या जुन्या नेत्यांना बदलून नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात संधी असावी अशी अपेक्षा होती. स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळेच भाजपा व वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसची हक्काची मते मिळाली़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर बदल करून नव्या पिढीच्या चेहºयाला संधी द्यावी, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

टॅग्स :Nandedनांदेड