शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:44 IST

किनवट तालुक्यातील इस्लापूर, शिवणी भागातील १४ ते १५ गावांना रविवारी सायंकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मानसिंगनाईक तांड्यासह काही गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नाल्याकाठची शेती खरडून गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बहुतांश घरांत पावसाचे पाणी घुसल्याने घरात ठेवलेल्या वस्तू व खतांचे नुकसान झाले़

ठळक मुद्देडोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती जलमय

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तेलंगणाच्या सीमेवरील जंगलातील नाल्यांचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित वाहल्याने नाल्यालगतची पिके शेतकºयांच्या हातून गेल्यात जमा आहेत. तोटंबा, मानसिंगनाईक तांडा, दीपलानाईक तांडा, चंद्रूनाईक तांडा, हुडी, कंचली, चिखली (ई), गोंड्रे महागाव, मार्लागुंडा, आंदबोरी (ई), कोसमेट, कोल्हारी, दुर्गानगर, पांगरपहाड या गावांना ८ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा बसून शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. नाल्याकाठच्या शेतातील उभी पिके खरडली. शेतात पाणी जाऊन पिके पाण्याखाली आली. पानथळ जमिनीतील पिके पिवळी व पिंगट पडून हातून गेल्याने शेतकरी चिंतीत आहे.---२० घरांत शिरले पाणीमानसिंगनाईक तांडा येथील वीसहून अधिक घरांत पाणी शिरले.गुणाजी चव्हाण यांचे यात प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील गावांना आ. प्रदीप नाईक व तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची बाब आ.नाईक यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या निदर्शनास आणून देत चिंतीत शेतकºयांना दिलासा दिला. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आ. नाईक यांनी केली. गावोगाव दिलेल्या भेटीत चिंतीत शेतकºयांशी संवादही साधला.---ओढ्याला पूरनिवघा बाजार ते वरुलादरम्यान ओढ्याला पूर आल्यामुळे ओढ्याचे पाणी शेतीत घुसल्याने मोठे नुकसान झाले़ तर तल्लारी येथे घरांची पडझड झाली़

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी