शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
4
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
5
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
6
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
7
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
8
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
9
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
10
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
11
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
12
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
13
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
14
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
15
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
16
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
17
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
18
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
19
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
20
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:37 IST

तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे ४० गावांसह वाड्या-तांड्यांवर ६७ अधिग्रहणे

कंधार : तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यात गतवर्षी सरासरी पर्जन्यवृष्टी झाली नाही. झालेला पाऊस अल्प व दीर्घ अंतराने झाला. त्यामुळे जलसाठे भरलेच नसल्याने टंचाईत भर पडली. त्यामुळे दुष्काळाने कहर केला आहे. टंचाई निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची व तसेच टँकर, अधिग्रहण आदींचे प्रस्ताव तयार करून दाखल करण्यासाठी कसरत होत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ४० गावे, वाडी, तांडयाची तहान ६७ बोअर व विहीर अधिग्रहणावर भागत आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहण संख्या कुरूळा ६ आहे. आंबुलगा ५, आलेगाव १, उमरगा खो. १, कंधारेवाडी २, कौठा १, खंडगाव ह. १, गुंडा बिंडा दिंडा १, गोणार १, घोडज ३, चिखलभोसी १, जाकापूर २, तळयाचीवाडी १, दाताळा २, दिग्रस खु.२, पानशेवडी १, बामणी प.क.१, बोरी खु.१, भुत्याचीवाडी १, भेंडेवाडी १, मंगलसांगवी ३, मसलगा २, मादाळी १, मानसिंगवाडी २, मुंडेवाडी १, लाठ खु.२, वहाद १, वहादतांडा १, शिरसी बु.१, शिरूर १, संगुचीवाडी २, सावरगाव १, सावळेश्वर १, हाटक्याळ ३, हाडोळी ब्र.१, हणमंतवाडी १, हारबळ प.कं.१, हाळदा ३, हासूळ ३, हिप्परगा शहा १ अधिग्रहण संख्या आहे.दरम्यान, याबाबत विचारले असता उपलब्ध जलसाठे मोठ्या प्रमाणात उपसले जात होते. मानार नदी, बारूळ प्रकल्प, जगतुंग समुद्र या जागी विद्युत पुरवठा चालू असताना वारेमाप उपसा केला जात होता. परंतु विद्युत वितरण, महसूल यंत्रणेकडून एकत्रित कार्यवाही केली. जगतुंग समुद्रातील १८ विद्युत मोटारी काढण्यात आल्या असून मानार प्रकल्पातील मोटारीही काढण्याची कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.विशेष दुरुस्तीची कामे संथगतीनेपाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रस्तावित आराखड्यात तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरूस्ती उपाययोजना ३६ मंजूर झाल्या. ऐन टंचाई काळात कामे पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळेल. याचा भरवसा राहत नाही. अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे करणे आणि पाणीपुरवठा सुरू करणे मोठे आव्हान ठरले. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाची मंजुरी व निविदा प्रक्रिया लांबली असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई