शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:37 IST

तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे ४० गावांसह वाड्या-तांड्यांवर ६७ अधिग्रहणे

कंधार : तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यात गतवर्षी सरासरी पर्जन्यवृष्टी झाली नाही. झालेला पाऊस अल्प व दीर्घ अंतराने झाला. त्यामुळे जलसाठे भरलेच नसल्याने टंचाईत भर पडली. त्यामुळे दुष्काळाने कहर केला आहे. टंचाई निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची व तसेच टँकर, अधिग्रहण आदींचे प्रस्ताव तयार करून दाखल करण्यासाठी कसरत होत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ४० गावे, वाडी, तांडयाची तहान ६७ बोअर व विहीर अधिग्रहणावर भागत आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहण संख्या कुरूळा ६ आहे. आंबुलगा ५, आलेगाव १, उमरगा खो. १, कंधारेवाडी २, कौठा १, खंडगाव ह. १, गुंडा बिंडा दिंडा १, गोणार १, घोडज ३, चिखलभोसी १, जाकापूर २, तळयाचीवाडी १, दाताळा २, दिग्रस खु.२, पानशेवडी १, बामणी प.क.१, बोरी खु.१, भुत्याचीवाडी १, भेंडेवाडी १, मंगलसांगवी ३, मसलगा २, मादाळी १, मानसिंगवाडी २, मुंडेवाडी १, लाठ खु.२, वहाद १, वहादतांडा १, शिरसी बु.१, शिरूर १, संगुचीवाडी २, सावरगाव १, सावळेश्वर १, हाटक्याळ ३, हाडोळी ब्र.१, हणमंतवाडी १, हारबळ प.कं.१, हाळदा ३, हासूळ ३, हिप्परगा शहा १ अधिग्रहण संख्या आहे.दरम्यान, याबाबत विचारले असता उपलब्ध जलसाठे मोठ्या प्रमाणात उपसले जात होते. मानार नदी, बारूळ प्रकल्प, जगतुंग समुद्र या जागी विद्युत पुरवठा चालू असताना वारेमाप उपसा केला जात होता. परंतु विद्युत वितरण, महसूल यंत्रणेकडून एकत्रित कार्यवाही केली. जगतुंग समुद्रातील १८ विद्युत मोटारी काढण्यात आल्या असून मानार प्रकल्पातील मोटारीही काढण्याची कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.विशेष दुरुस्तीची कामे संथगतीनेपाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रस्तावित आराखड्यात तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरूस्ती उपाययोजना ३६ मंजूर झाल्या. ऐन टंचाई काळात कामे पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळेल. याचा भरवसा राहत नाही. अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे करणे आणि पाणीपुरवठा सुरू करणे मोठे आव्हान ठरले. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाची मंजुरी व निविदा प्रक्रिया लांबली असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई