शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 18:38 IST

देगलूरच्या धुंडा महाराज महाविद्यालयातील प्रकार.

- शब्बीर शेखदेगलूर:  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता शिक्षण मंडळाने योग्य ती तयारी करून घेणे अपेक्षित होते.मात्र शिक्षण मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षार्थींना डेस्कच उपलब्ध नसल्याने चक्क खुर्चीवर बसूनच परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार शहरातील धुंडा महाराज महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

तालुक्यातील आश्रम शाळा शिळवणी तांडा, इंदिराबाई देशमुख महाविद्यालय हणेगाव,श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज मरखेल तसेच शहरातील देगलूर महाविद्यालय , धुंडा महाराज महाविद्यालय, व मानव्य विकास विद्यालय अशा सहा ठिकाणी एकूण 2451 विद्यार्थी बारावीच्या परीक्षा देत आहेत. त्यापैकी शहरात असलेल्या धुंडा महाराज महाविद्यालय येथे 324 विद्यार्थी परीक्षा देत असताना मात्र या महाविद्यालयात 220 डेस्कच उपलब्ध असल्याने उर्वरित परीक्षार्थींना डिस्कविनाच फक्त खुर्चीवर बसूनच पेपर लिहिण्याची नामुष्की ओढवली आहे.  विशेष म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता तालुक्यातील शिक्षण मंडळाने योग्य ती तयारी करून घेणे अपेक्षित होते. याकडे डोळे झाक केल्याने परीक्षार्थी यांच्यावर आजचा प्रसंग ओढवला आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आला आहे. याप्रकरणी अधिकची माहिती घेण्यासाठी परीक्षा प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी तोटरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

अभिप्राय नोंदवला आहे आज सकाळी परीक्षेदरम्यान धुंडा महाराज महाविद्यालयास भेट दिली असता हा प्रकार माझ्याही निदर्शनास आला आहे. याप्रकरणी मी माझा अभिप्राय नोंदविला असून सोबतच हा संपूर्ण प्रकार नांदेडचे शिक्षणाधिकारी यांच्याही कानावर घातले आहे.- राजाभाऊ कदम, तहसीलदार,देगलूर

योग्य ती काळजी घ्यावी खुर्चीवर पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याप्रकरणी शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देऊन विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा.- धनाजी जोशी, शिवसेना, शहर संघटक (शिंदे गट)

टॅग्स :NandedनांदेडHSC / 12th Exam12वी परीक्षाexamपरीक्षा