शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

बाराही महिने फुलशेतीतून मिळविले रोखीने उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 12:10 IST

यशकथा : अर्धापूर  तालुक्यातील पार्डी येथील फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़ 

- युनूस नदाफ (पार्डी जि. नांदेड)

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी मागील चार वर्षांपासून फुलशेती करून हमखास रोखीचे उत्पन्न मिळवीत आहेत़ वर्षातील बाराही महिने फुलशेती करून आपला उदरनिर्वाह भागवीत आहेत़ फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़ 

तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत चालल्याने शेतीतील वार्षिक उत्पन्न कमी होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत राहिले़ शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळत आहेत़ हा तालुका केळी, हळद, सोयाबीनसाठी प्रसिद्ध असून, केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने केळीचे उत्पादन कमी झाले, तसेच या वर्षात दुष्काळ परिस्थितीतून केळीला वाचविले; परंतु भाव कमी मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्यामुळे मागील चार वर्षांपासून शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत़

येथील शेतकरी इतर पिकांबरोबरच फुलशेती करीत आहेत़ यामुळे रोजच्या रोज शेतकऱ्यांना रोखीचे पैसे मिळत आहेत़ येथे मोठ्या प्रमाणावर गुलाब, झेंडू व मोगरा या जातीच्या फुलांची लागवड करण्यात येत आहे़ येथील शेतकरी माधवराव कवडे यांच्या शेतात बाराही महिने फुले असतात़ त्यांनी या वर्षात एक एकरमध्ये झेंडू, गुलाब फुलांची लागवड केली आहे़ यासाठी त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केला आहे़ त्यांचा मुलगा दररोज फुले घेऊन शहरातील फुलबाजारामध्ये फुलांची विक्री करतात़ येथे त्याच्या फुलाला भरपूर भाव मिळतो़ यातून सर्व खर्च जाऊन त्यांना १,५०० ते २,०००  रुपये मिळतात़

माधवराव कवडे यांच्याकडे सहा एकर जमीन असून, त्यांनी वीस गुंठ्यात गुलाब, नेटसेटमध्ये तीस गुंठे गुलाब व एक एकरमध्ये झेंडू लागवड केली आहे़ त्यासाठी त्यांना तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला असून, दररोज १,५०० ते २,००० रुपये उत्पन्न होत आहे़ त्यांनी आपल्या शेतात फुलशेतीसाठी सिंगल फेजची जोडणी केली़ कारण की थ्री फेजची लाईट ८ तास मिळते़ त्यामुळे त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून सिंगल फेजची जोडणी केली आहे़ त्याचबरोबर फुलशेतीत ठिबक सिंचनाने पाणी देण्यात येते़ त्यामुळे पाण्याची व वेळेची बचत होत आहे़ उन्हाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर फुलांना पाणी लागते़ त्यामुळे ठिबक संचाचा वापर करण्यात आले आहे़ 

मी गेल्या चार वर्षांपासून फुलशेती करीत आहे़ मला फुलापासून चांगले उत्पन्न मिळत आहे़ त्यामुळे केळी व हळद हे पिके कमी केली आहेत़ उन्हाळ्यात फुलांची मागणी जास्त असते़ त्यामुळे भरपूर पैसा मिळतो, असे शेतकरी माधवराव कवडे यांनी सांगितले. नापिकीला आत्महत्येचा पर्याय असू शकत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी