शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

बाराही महिने फुलशेतीतून मिळविले रोखीने उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 12:10 IST

यशकथा : अर्धापूर  तालुक्यातील पार्डी येथील फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़ 

- युनूस नदाफ (पार्डी जि. नांदेड)

अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी मागील चार वर्षांपासून फुलशेती करून हमखास रोखीचे उत्पन्न मिळवीत आहेत़ वर्षातील बाराही महिने फुलशेती करून आपला उदरनिर्वाह भागवीत आहेत़ फुलशेतीमधून शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळवीत आहेत़ 

तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत चालल्याने शेतीतील वार्षिक उत्पन्न कमी होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत राहिले़ शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळत आहेत़ हा तालुका केळी, हळद, सोयाबीनसाठी प्रसिद्ध असून, केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने केळीचे उत्पादन कमी झाले, तसेच या वर्षात दुष्काळ परिस्थितीतून केळीला वाचविले; परंतु भाव कमी मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ त्यामुळे मागील चार वर्षांपासून शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत़

येथील शेतकरी इतर पिकांबरोबरच फुलशेती करीत आहेत़ यामुळे रोजच्या रोज शेतकऱ्यांना रोखीचे पैसे मिळत आहेत़ येथे मोठ्या प्रमाणावर गुलाब, झेंडू व मोगरा या जातीच्या फुलांची लागवड करण्यात येत आहे़ येथील शेतकरी माधवराव कवडे यांच्या शेतात बाराही महिने फुले असतात़ त्यांनी या वर्षात एक एकरमध्ये झेंडू, गुलाब फुलांची लागवड केली आहे़ यासाठी त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केला आहे़ त्यांचा मुलगा दररोज फुले घेऊन शहरातील फुलबाजारामध्ये फुलांची विक्री करतात़ येथे त्याच्या फुलाला भरपूर भाव मिळतो़ यातून सर्व खर्च जाऊन त्यांना १,५०० ते २,०००  रुपये मिळतात़

माधवराव कवडे यांच्याकडे सहा एकर जमीन असून, त्यांनी वीस गुंठ्यात गुलाब, नेटसेटमध्ये तीस गुंठे गुलाब व एक एकरमध्ये झेंडू लागवड केली आहे़ त्यासाठी त्यांना तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला असून, दररोज १,५०० ते २,००० रुपये उत्पन्न होत आहे़ त्यांनी आपल्या शेतात फुलशेतीसाठी सिंगल फेजची जोडणी केली़ कारण की थ्री फेजची लाईट ८ तास मिळते़ त्यामुळे त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून सिंगल फेजची जोडणी केली आहे़ त्याचबरोबर फुलशेतीत ठिबक सिंचनाने पाणी देण्यात येते़ त्यामुळे पाण्याची व वेळेची बचत होत आहे़ उन्हाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर फुलांना पाणी लागते़ त्यामुळे ठिबक संचाचा वापर करण्यात आले आहे़ 

मी गेल्या चार वर्षांपासून फुलशेती करीत आहे़ मला फुलापासून चांगले उत्पन्न मिळत आहे़ त्यामुळे केळी व हळद हे पिके कमी केली आहेत़ उन्हाळ्यात फुलांची मागणी जास्त असते़ त्यामुळे भरपूर पैसा मिळतो, असे शेतकरी माधवराव कवडे यांनी सांगितले. नापिकीला आत्महत्येचा पर्याय असू शकत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी