शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

तोडणीसाठी शेतात जाता येईना; सततच्या पावसामुळे मूग, उडीद हातचे गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:54 IST

मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़

ठळक मुद्देजिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर मूग, उडीदाचा पेरासततच्या पावसाने तोडणीचे काम थांबले

नांदेड : मागील सात, आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने  काढणीला आलेल्या मुगाचे ५० टक्के नुकसान केले असून सोयाबीनचे पीकही पिवळे पडले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे़ 

सध्या मूग काढणीला आला आहे़ मात्र याच वेळेला पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़ तर सोयाबीनचे पीकही पिवळे पडत चालले आहे़  

जिल्ह्यात हिमायतनगर, किनवट, भोकर, माहूर या तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आला असून काही  गावांचा संपर्क तुटला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान केले आहे़ सुरूवातीला झालेल्या पोषक पावसामुळे यंदा मुग, सोयाबीनचे पिके जोमात आली होती़ मुगाच्या शेंगा काढणीला आल्या होत्या़ मात्र ऐन वेळेला पावसाने हजेरी लावल्याने मुगाच्या शेंगा काढण्यास वेळच मिळाला नाही़  यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती़ मात्र आता मूग, उडीद व सोयाबीन हे  पिके  हातची गेले आहेत़ सर्वाधिक नुकसान मुगाच्या पिकाचे झाले असून काढणीला आलेल्या शेंगा वाळल्या असून त्यातून आता मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मुगाचे पीक पुर्णत: हातचे गेले आहे़ उडीदाच्याशेंगा  परिपक्व नसल्याने त्या काढणीला आल्या नाहीत़ दरम्यान, बुधवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर गुरूवारी पुन्हा सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली़ हवामान विभागाने पुढील पाच दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे आता उरलेल्या मूगाचे पीकही हातचे जाणार आहे़  नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ 

मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जाता येईनाजिल्ह्यात यंदा जवळपास ५० हजार हेक्टरवर मूग आणि उडीदाचा पेरा झाला आहे़ सुरूवातीला या पिकांना पोषक पाऊस झाल्याने मूग, उडीदाचे पिक बहरले होते़ सध्या मूग काढणीला आला असून सततच्या पावसाने मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ त्यामुळे मूग तोडणी लांबली आहे़ मुगास यंदा प्रति हेक्टरी पाच ते सात क्विंटलचा उतारा येत आहे़ उडीदाच्या शेंगा परिपक्व झाल्या असल्या तरी काढणीस आल्या नाहीत़ त्यामुळे उडीदाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत़ मात्र मुगाच्या शेंगा वाळल्या असून सततच्या पावसाने शेंगातून मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मूगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे चित्र असून, पाऊस असाच राहिल्यास सोयाबीनलाही धोका होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

२६ हजार हेक्टरवर पेरणीमागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून शेतकऱ्यांनी यंदा कापसाऐवजी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला आहे़ तर  मूगाची २६ हजार हेक्टरवर पेरणी केली होती़ ऐन मूग काढणीला सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे पिंपरी महिपाल येथील शेतकरी नागोराव चंदेल यांनी सांगितले़  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी