शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

तोडणीसाठी शेतात जाता येईना; सततच्या पावसामुळे मूग, उडीद हातचे गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:54 IST

मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़

ठळक मुद्देजिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर मूग, उडीदाचा पेरासततच्या पावसाने तोडणीचे काम थांबले

नांदेड : मागील सात, आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने  काढणीला आलेल्या मुगाचे ५० टक्के नुकसान केले असून सोयाबीनचे पीकही पिवळे पडले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे़ 

सध्या मूग काढणीला आला आहे़ मात्र याच वेळेला पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़ तर सोयाबीनचे पीकही पिवळे पडत चालले आहे़  

जिल्ह्यात हिमायतनगर, किनवट, भोकर, माहूर या तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आला असून काही  गावांचा संपर्क तुटला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान केले आहे़ सुरूवातीला झालेल्या पोषक पावसामुळे यंदा मुग, सोयाबीनचे पिके जोमात आली होती़ मुगाच्या शेंगा काढणीला आल्या होत्या़ मात्र ऐन वेळेला पावसाने हजेरी लावल्याने मुगाच्या शेंगा काढण्यास वेळच मिळाला नाही़  यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती़ मात्र आता मूग, उडीद व सोयाबीन हे  पिके  हातची गेले आहेत़ सर्वाधिक नुकसान मुगाच्या पिकाचे झाले असून काढणीला आलेल्या शेंगा वाळल्या असून त्यातून आता मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मुगाचे पीक पुर्णत: हातचे गेले आहे़ उडीदाच्याशेंगा  परिपक्व नसल्याने त्या काढणीला आल्या नाहीत़ दरम्यान, बुधवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर गुरूवारी पुन्हा सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली़ हवामान विभागाने पुढील पाच दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे आता उरलेल्या मूगाचे पीकही हातचे जाणार आहे़  नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ 

मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जाता येईनाजिल्ह्यात यंदा जवळपास ५० हजार हेक्टरवर मूग आणि उडीदाचा पेरा झाला आहे़ सुरूवातीला या पिकांना पोषक पाऊस झाल्याने मूग, उडीदाचे पिक बहरले होते़ सध्या मूग काढणीला आला असून सततच्या पावसाने मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ त्यामुळे मूग तोडणी लांबली आहे़ मुगास यंदा प्रति हेक्टरी पाच ते सात क्विंटलचा उतारा येत आहे़ उडीदाच्या शेंगा परिपक्व झाल्या असल्या तरी काढणीस आल्या नाहीत़ त्यामुळे उडीदाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत़ मात्र मुगाच्या शेंगा वाळल्या असून सततच्या पावसाने शेंगातून मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मूगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे चित्र असून, पाऊस असाच राहिल्यास सोयाबीनलाही धोका होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

२६ हजार हेक्टरवर पेरणीमागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून शेतकऱ्यांनी यंदा कापसाऐवजी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला आहे़ तर  मूगाची २६ हजार हेक्टरवर पेरणी केली होती़ ऐन मूग काढणीला सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे पिंपरी महिपाल येथील शेतकरी नागोराव चंदेल यांनी सांगितले़  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी