शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

"दिल्लीत बटन दाबलं जातंय अन् इकडे शेतकरी, कामगारांच्या खिशातून पैसे जातात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 21:08 IST

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

नांदेड - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये दाखल झाले असून महाराष्ट्रातील राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज पार पडली. सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, भारत देशात पैशाची कमी नाही, पण तो सर्वाधिक पैसा काही मोजक्याच उद्योगपतींच्या खिशात भरला जातोय, असे राहुल यांनी म्हटले.  

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. देशातील लोकांना कंगाल करण्याचं काम मोदींनी केलंय. काही वर्षांपूर्वी देशात नोटबंदी जाहीर केली आणि सर्वसामान्य व लहान व्यापाऱ्यांची कोंडी केली. जीएसटी कायदा लागू केला, शेतकऱ्यांच्या मालावर कर लावला. केंद्रातील मोदी सरकार हे केवळ काही बड्या उद्योगपतींसाठी काम करतंय. आपल्या देशात पैशाची कमतरता नाही, पण तो पैसा फक्त याच उद्योगपतींकडे आहे. देशातील शेतकरी, मजदूर, लहान व्यापाऱ्यांच्या खिशातून हा पैसा काढला जातोय. दिल्लीत बसून एक बटण दाबलं जातं आणि इकडे शेतकरी, मजदूर यांच्या खिशातून पैसा निघून जातो, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. 

मोदींनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, २ कोटी रोजगारांचं काय झालं, १५ लाख रुपयांचं काय झालं, काळ्या पैशाचं काय झालं? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित जनतेला विचारले. तसेच, आरएसएसवाले केवळ स्वत:साठी मागण्याचं काम करतात. मात्र, काँग्रेस देण्याचं काम करते, असे म्हणत राहुल यांनी केदारनाथमध्ये त्यांना आलेला एक अनुभवही येथील जाहीर सभेत बोलून दाखवला. 

राहुल गांधींची यात्रा ही चळवळ

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही एकच चळवळ आहे. इतर नेते जे करतात तो इव्हेंट असतो आणि ही यात्रा म्हणजे मूव्हमेंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटायला जातात, तेव्हा त्यांचा चेहरा कुठे असतो, मोदींचा चेहरा कॅमेऱ्याकडे असतो. मात्र, आपण सर्वांनीच पाहिलं आहे. भारत जोडो यात्रेत जेव्हा सोनिया गांधींनी सहभाग घेतला. त्यावेळी सोनिया गांधीच्या पायातील बुटाची लेस निघाली होती. राहुल गांधींनी खाली वाकून आईच्या पायातील बुटाची लेस बांधली. त्यावेळी, राहुल गांधींचा चेहरा कुठे होता, आपण सर्वांनीच पाहिलंय, राहुल गांधींचा चेहरा त्यांच्या आईच्या पायाशी होता, असे म्हणत नाना पटोले यांनी इव्हेंट आणि मूव्हमेंटमधील फरक सांगितला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेडBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा