शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

"दिल्लीत बटन दाबलं जातंय अन् इकडे शेतकरी, कामगारांच्या खिशातून पैसे जातात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 21:08 IST

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

नांदेड - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये दाखल झाले असून महाराष्ट्रातील राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज पार पडली. सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, भारत देशात पैशाची कमी नाही, पण तो सर्वाधिक पैसा काही मोजक्याच उद्योगपतींच्या खिशात भरला जातोय, असे राहुल यांनी म्हटले.  

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. देशातील लोकांना कंगाल करण्याचं काम मोदींनी केलंय. काही वर्षांपूर्वी देशात नोटबंदी जाहीर केली आणि सर्वसामान्य व लहान व्यापाऱ्यांची कोंडी केली. जीएसटी कायदा लागू केला, शेतकऱ्यांच्या मालावर कर लावला. केंद्रातील मोदी सरकार हे केवळ काही बड्या उद्योगपतींसाठी काम करतंय. आपल्या देशात पैशाची कमतरता नाही, पण तो पैसा फक्त याच उद्योगपतींकडे आहे. देशातील शेतकरी, मजदूर, लहान व्यापाऱ्यांच्या खिशातून हा पैसा काढला जातोय. दिल्लीत बसून एक बटण दाबलं जातं आणि इकडे शेतकरी, मजदूर यांच्या खिशातून पैसा निघून जातो, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. 

मोदींनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, २ कोटी रोजगारांचं काय झालं, १५ लाख रुपयांचं काय झालं, काळ्या पैशाचं काय झालं? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित जनतेला विचारले. तसेच, आरएसएसवाले केवळ स्वत:साठी मागण्याचं काम करतात. मात्र, काँग्रेस देण्याचं काम करते, असे म्हणत राहुल यांनी केदारनाथमध्ये त्यांना आलेला एक अनुभवही येथील जाहीर सभेत बोलून दाखवला. 

राहुल गांधींची यात्रा ही चळवळ

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही एकच चळवळ आहे. इतर नेते जे करतात तो इव्हेंट असतो आणि ही यात्रा म्हणजे मूव्हमेंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आईला भेटायला जातात, तेव्हा त्यांचा चेहरा कुठे असतो, मोदींचा चेहरा कॅमेऱ्याकडे असतो. मात्र, आपण सर्वांनीच पाहिलं आहे. भारत जोडो यात्रेत जेव्हा सोनिया गांधींनी सहभाग घेतला. त्यावेळी सोनिया गांधीच्या पायातील बुटाची लेस निघाली होती. राहुल गांधींनी खाली वाकून आईच्या पायातील बुटाची लेस बांधली. त्यावेळी, राहुल गांधींचा चेहरा कुठे होता, आपण सर्वांनीच पाहिलंय, राहुल गांधींचा चेहरा त्यांच्या आईच्या पायाशी होता, असे म्हणत नाना पटोले यांनी इव्हेंट आणि मूव्हमेंटमधील फरक सांगितला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेडBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा