शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

दाेन दिवसांच्या संततधार पावसाने महापालिकेची एकूणच पाेलखाेल केली आहे. तुंबलेल्या नाल्या व गटार यामुळे पावसाचे पाणी पुढे निघून न ...

दाेन दिवसांच्या संततधार पावसाने महापालिकेची एकूणच पाेलखाेल केली आहे. तुंबलेल्या नाल्या व गटार यामुळे पावसाचे पाणी पुढे निघून न जाता जागीच थांबले. त्यामुळे नाल्यामधील घाण रस्त्यावर आली. शहरातील ड्रेनेजला व्यवस्थित आऊटलेट नाही, पाण्याचा निचरा हाेत नाही. त्याला लेवल नाही, हेही यातून पुढे आले. रस्त्यांवर पाण्याचे अक्षरश: तलाव साचलेले पाहायला मिळाले. शहरातील नावघाट, गाेवर्धनघाट, मुजामपेठ, इतवारा, देगलूर नाका, सिद्धार्थनगर, मंडई, करबला अशा विविध भागांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घराघरात पाणी शिरल्याने गाेरगरिबांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक लाेक पुरात व पावसात अडकून पडले हाेते. जीवरक्षक कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनाची तेवढी तत्परता दिसून आली नाही. या पुरांमध्ये काही युवक हुल्लडबाजी करतानाही पाहायला मिळाले. अखेर दासगणू पुलावर ही हुल्लडबाजी राेखण्यासाठी पाेलिसांना तैणात करावे लागले. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामुळे महापालिकेकडून नाल्यांची सफाई याेग्य पद्धतीने व नियमित हाेत नसल्याचे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले. शहरातील स्मशानभूमी, धार्मिक स्थळेसुद्धा पाण्याखाली आल्याचे पाहायला मिळाले. मागास वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथे तातडीने मदत पाेहाेचली नसल्याची ओरड ऐकायला मिळाली. वास्तविक महापालिकेने स्थलांतरीतांसाठी केलेली निवारा व्यवस्था व संबंधितांचे संपर्क क्रमांक समाजमाध्यमावर जाहीर केले; मात्र ते पुरात अडकलेल्यांपर्यंत पाेहाेचले नसल्याचे दिसून आले.

चाैकट....

राजकीय, शासकीय यंत्रणा आहे कुठे ?

शहरात २४ तासांतील संततधार पावसानंतर उद्भवलेली स्थिती लक्षात घेता महापालिकेतील राजकीय व शासकीय यंत्रणा मागास वस्त्यांमध्ये मदतीसाठी धावल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. त्यामुळे रहिवासी वस्त्यांमध्ये महापालिकेच्या कारभाराविराेधात आक्राेश दिसून आला. वस्त्यांमध्ये पाणी शिरले असताना महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी तिकडे फिरकले नसल्याचे सांगितले जाते.

चाैकट....

नुकसानाचे पंचनामे त्वरित करा- जिल्हाधिकारी

अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत जिल्ह्यात शेती, पिके, घरे, जनावरांच्या मृत्यूने माेठे नुकसान झाले असून, त्याचे तातडीने पंचनामे करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटनकर यांनी दिला. बुधवारी त्यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे कृतीदल स्थापन केले आहे. पाणीसाठा, पाझर तलावांची स्थिती याचा आढावा घेण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यावर साेपविण्यात आली. विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन वेळा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामाेरे जावे लागले. साेयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.