शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

संततधार पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

दाेन दिवसांच्या संततधार पावसाने महापालिकेची एकूणच पाेलखाेल केली आहे. तुंबलेल्या नाल्या व गटार यामुळे पावसाचे पाणी पुढे निघून न ...

दाेन दिवसांच्या संततधार पावसाने महापालिकेची एकूणच पाेलखाेल केली आहे. तुंबलेल्या नाल्या व गटार यामुळे पावसाचे पाणी पुढे निघून न जाता जागीच थांबले. त्यामुळे नाल्यामधील घाण रस्त्यावर आली. शहरातील ड्रेनेजला व्यवस्थित आऊटलेट नाही, पाण्याचा निचरा हाेत नाही. त्याला लेवल नाही, हेही यातून पुढे आले. रस्त्यांवर पाण्याचे अक्षरश: तलाव साचलेले पाहायला मिळाले. शहरातील नावघाट, गाेवर्धनघाट, मुजामपेठ, इतवारा, देगलूर नाका, सिद्धार्थनगर, मंडई, करबला अशा विविध भागांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घराघरात पाणी शिरल्याने गाेरगरिबांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक लाेक पुरात व पावसात अडकून पडले हाेते. जीवरक्षक कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनाची तेवढी तत्परता दिसून आली नाही. या पुरांमध्ये काही युवक हुल्लडबाजी करतानाही पाहायला मिळाले. अखेर दासगणू पुलावर ही हुल्लडबाजी राेखण्यासाठी पाेलिसांना तैणात करावे लागले. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामुळे महापालिकेकडून नाल्यांची सफाई याेग्य पद्धतीने व नियमित हाेत नसल्याचे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले. शहरातील स्मशानभूमी, धार्मिक स्थळेसुद्धा पाण्याखाली आल्याचे पाहायला मिळाले. मागास वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथे तातडीने मदत पाेहाेचली नसल्याची ओरड ऐकायला मिळाली. वास्तविक महापालिकेने स्थलांतरीतांसाठी केलेली निवारा व्यवस्था व संबंधितांचे संपर्क क्रमांक समाजमाध्यमावर जाहीर केले; मात्र ते पुरात अडकलेल्यांपर्यंत पाेहाेचले नसल्याचे दिसून आले.

चाैकट....

राजकीय, शासकीय यंत्रणा आहे कुठे ?

शहरात २४ तासांतील संततधार पावसानंतर उद्भवलेली स्थिती लक्षात घेता महापालिकेतील राजकीय व शासकीय यंत्रणा मागास वस्त्यांमध्ये मदतीसाठी धावल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. त्यामुळे रहिवासी वस्त्यांमध्ये महापालिकेच्या कारभाराविराेधात आक्राेश दिसून आला. वस्त्यांमध्ये पाणी शिरले असताना महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी तिकडे फिरकले नसल्याचे सांगितले जाते.

चाैकट....

नुकसानाचे पंचनामे त्वरित करा- जिल्हाधिकारी

अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत जिल्ह्यात शेती, पिके, घरे, जनावरांच्या मृत्यूने माेठे नुकसान झाले असून, त्याचे तातडीने पंचनामे करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटनकर यांनी दिला. बुधवारी त्यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे कृतीदल स्थापन केले आहे. पाणीसाठा, पाझर तलावांची स्थिती याचा आढावा घेण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यावर साेपविण्यात आली. विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन वेळा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामाेरे जावे लागले. साेयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.