शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: May 17, 2024 18:51 IST

शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात.

नांदेड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील तब्बल ३ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जूनला पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे १ लाख ८० हजार ३३६ इतके विद्यार्थी आहेत, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे १ लाख १७ हजार ७७४ विद्यार्थी संख्या आहे. अशी एकूण मिळून २ लाख ९८ हजार ११० विद्यार्थी संख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळण्यासाठी नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे यांनी सांगितले. यावर्षी एकात्मिक स्वरूपात पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एकाच संचामध्ये इंग्रजी, गणित यासह इतर विषय असणार आहेत. ही पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या स्वंयअर्थसाहाय्यित शाळा सोडून इतर सर्व शाळांना वितरित केली जातील.

पाठ्यपुस्तकांसाठी १० कोटी ६७ लाखांची तरतूदजिल्ह्यात पहिली ते पाचवीसाठी १ लाख ४३ हजार ४९२ पुस्तकांचा संच तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ३६ हजार ९७५ पुस्तकांचे एकात्मिक संच लागणार आहेत. यासाठी शासनाकडून १० कोटी ६७ लाख १५ हजार २३५ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय विद्यार्थीसंख्याइयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या अशी-बिलोली ८६३९ विद्यार्थी, धर्माबाद ६६५२, नायगाव १०,४२५, देगलूर १२,६२७, नांदेड १०४५५, अर्धापूर ७३०५, मुदखेड ७७२७, किनवट १७१३४, माहूर ७७००, हदगाव १८२०८, हिमायतनगर ७२१०, मुखेड १८८२६, भोकर १० हजार ४०, उमरी ७३४२, कंधार १५३०६, लोहा १६२६० याप्रमाणे १ लाख ८० हजार ३३६ प्राथमिकची तर १ लाख १७ हजार ७७४ इयत्ता सहावी ते आठवीची विद्यार्थी संख्या आहे.

बालभारतीकडून नांदेडला रवानापाठ्यपुस्तकाचे संच लातूर येथील बालभारती कार्यालयातून नांदेड जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. सदर पाठ्यपुस्तके वजिराबाद येथील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये उतरली जाणार आहेत. त्यानंतर पुस्तकांचे तालुकास्तरावर प्रत्येक शाळेत वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा