शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: May 17, 2024 18:51 IST

शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात.

नांदेड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील तब्बल ३ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जूनला पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे १ लाख ८० हजार ३३६ इतके विद्यार्थी आहेत, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे १ लाख १७ हजार ७७४ विद्यार्थी संख्या आहे. अशी एकूण मिळून २ लाख ९८ हजार ११० विद्यार्थी संख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळण्यासाठी नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे यांनी सांगितले. यावर्षी एकात्मिक स्वरूपात पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एकाच संचामध्ये इंग्रजी, गणित यासह इतर विषय असणार आहेत. ही पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या स्वंयअर्थसाहाय्यित शाळा सोडून इतर सर्व शाळांना वितरित केली जातील.

पाठ्यपुस्तकांसाठी १० कोटी ६७ लाखांची तरतूदजिल्ह्यात पहिली ते पाचवीसाठी १ लाख ४३ हजार ४९२ पुस्तकांचा संच तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ३६ हजार ९७५ पुस्तकांचे एकात्मिक संच लागणार आहेत. यासाठी शासनाकडून १० कोटी ६७ लाख १५ हजार २३५ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय विद्यार्थीसंख्याइयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या अशी-बिलोली ८६३९ विद्यार्थी, धर्माबाद ६६५२, नायगाव १०,४२५, देगलूर १२,६२७, नांदेड १०४५५, अर्धापूर ७३०५, मुदखेड ७७२७, किनवट १७१३४, माहूर ७७००, हदगाव १८२०८, हिमायतनगर ७२१०, मुखेड १८८२६, भोकर १० हजार ४०, उमरी ७३४२, कंधार १५३०६, लोहा १६२६० याप्रमाणे १ लाख ८० हजार ३३६ प्राथमिकची तर १ लाख १७ हजार ७७४ इयत्ता सहावी ते आठवीची विद्यार्थी संख्या आहे.

बालभारतीकडून नांदेडला रवानापाठ्यपुस्तकाचे संच लातूर येथील बालभारती कार्यालयातून नांदेड जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. सदर पाठ्यपुस्तके वजिराबाद येथील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये उतरली जाणार आहेत. त्यानंतर पुस्तकांचे तालुकास्तरावर प्रत्येक शाळेत वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा