शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लग्नात अहेर म्हणून आप्तेष्टांना दिली पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:16 IST

तालुक्यातील सरसम येथील मातंग समाजाच्या दोन्हींकडील कुटंबांचा विवाहसोहळा वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे़ लग्नात आप्तेष्ट आणि नातेवाईकांना अहेर व वस्तू भेट देण्याऐवजी महापुरुषांची पुस्तके देऊन समाजात आगळावेगळा उपक्रम राबविला आहे़ या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे़

ठळक मुद्देसरसम येथील विवाह सोहळ्याची चर्चामहापुरुषांचे विचार समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न

हिमायतनगर : तालुक्यातील सरसम येथील मातंग समाजाच्या दोन्हींकडील कुटंबांचा विवाहसोहळा वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे़ लग्नात आप्तेष्ट आणि नातेवाईकांना अहेर व वस्तू भेट देण्याऐवजी महापुरुषांची पुस्तके देऊन समाजात आगळावेगळा उपक्रम राबविला आहे़ या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे़सरसम येथील पार्वतीबाई संभाजी गणपत बनसोडे यांचे तृतीय चिरंजीव राजेश व अरुणा गंगाधर दांडेकर यांची ज्येष्ठ कन्या आरती यांचा विवाहसोहळा २७ मे रोजी पार पडला़ हा विवाह सोहळा सत्यशोधक विवाह पद्धतीने लावण्यात आला़ सत्यशोधक पद्धतीत मंगलअष्टकाऐवजी महापुरुषांच्या विचारगाथा माँ जिजाऊ, सावित्रीबाई, फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा आदी महामानवांच्या विचारधारेतील मार्गाचा अनुरोध करुन नवरी व नवरदेव यांना प्रार्थना देऊन विवाह लावण्यात आला. यावेळी अक्षदाऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली.हा विवाह सत्यशोधक समाज महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष के. एम. वाघमारे, समाजसेवक एम. आर. नकेवार यांच्या हस्ते झाला. बनसोडे परिवार सुशिक्षित असल्याने अगोदर दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या एका मुलाचा विवाह बौद्ध पद्धतीने लावून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला होता़समाजातील अनेक नागरिक होते उपस्थितविवाहप्रसंगी कै.देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष श्यामराव देशमुख, मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, लोकडे, गोविंद गोखले, परमेश्वर गोपतवाड, बापूराव आडे, सुनील गोखले, सुभाष दारवंडे, सोपान बोंपिलवार, डाके, दत्ता शिराने, गंगाधर वाघमारे व सर्वच समाजातील नागरिक, पत्रकार, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.व-हाडींनीही नवदांम्पत्याला दिली पुस्तके भेटलग्नापूर्वीच सर्व पाहुणेमंडळी आणि व-हाडींना या उपक्रमाची कल्पना देण्यात आली होती़ त्यामुळे बहुतांश वºहाडी मंडळींनीही दाम्पत्याला भेट देण्यासाठी पुस्तके आणली होती़ त्यामध्ये देशातील महापुरुषांचे आत्मचरित्र, त्यांचा जीवनप्रवास यांचा समावेश असलेली पुस्तके अधिक होती़ त्यानंतर ही पुस्तके नातेवाईकांना अहेर म्हणून देण्यात आली़ या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे परिसरात कौतुक होत असून अशाचप्रकारे सोहळे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

 

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नSocialसामाजिक