शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

माणूसभर उंचीच्या कपाशीला बोंडे नगण्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 13:05 IST

शेतक-यांना यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देअति पावसामुळे वाढ खुंटण्यासोबतच उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत़

बिलोली : शेतात उंचच उंच वाढलेल्या कपाशीत प्रवेश केल्यानंतर माणुसही दिसणार नाही, असे चित्र दिसत़ ८० ते ९० बोंड असतील आणि २० क्विंटल उत्पादन होईल अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली आहे़ एवढी वाढ होवूनही या कपाशीला मोजकेच बोंडे लागली आहेत़बहुतांश ठिकाणी उंच वाढलेल्या कपाशीला मोजकीच बोंड असून काही ठिकाणी ना कपाशी वाढली ना बोंडाची संख्या  वाढली, अशी परिस्थिती आहे.त्यामुळे शेतक-यांना माञ यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे.

यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत़ सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जवळपास दीड महिना सातत्यपुर्ण पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसानेही जाता जाता शेतक-यांना दणका दिला. मध्यंतरीच्या काळात काही भागात कपाशीचे पीक जोमाने वाढले. हिरवीकच उंचच उंच वाढलेली आणि दाटीवाटीने बहरलेली कपाशी पाहून कुणालाही एकरी १५ ते १६ क्विंटल उत्पन्न होईल, असाच भास होतो. पण, कपाशीत गेल्यानंतर माञ परिस्थिती वेगळीच दिसते. उंच वाढलेल्या कपाशीला केवळ दहा ते पंधरा बोंड आहे, नव्याने पाती नावालाच आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट असुन निम्मेही उत्पादन होईल किंवा नाही, याबाबत शेतक-यांना शंका आहे. त्यात अत्यल्प अनुदानानेही निराशा केली आहे़

सरसकट मदत देण्याची गरजपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.प्रशासनाने आणेवारी कोणत्या पध्दतीने काढली ते कळायला मार्ग नाही. शेतक-यांना सरसकट मदत देण्याची गरज आहे असे बिलोली तालुक्यातल्या असंख्य शेतक-यांनी केली आहे.कधी अधिक फरकाने सर्वच शेतक-यांची परिस्थिती सारखी आहे. काहींच्या शेतातील कपाशी तीन ते चार फुटांच्या वर वाढलेली नाही. या कपाशीलाही कुठे दोन,कुठे तीन तर कुठे जास्तीत जास्त दहा ते पंधरा बोंड आहेत.त्यामुळे सर्वञच कपाशीच्या उत्पन्नाबाबत विदारक परिस्थिती आहे. 

हे नुकसान कुठुन भरुन काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या आणेवारीत सुबत्ता दाखविली आहे. पण, ही सुबत्ता कुठे दिसली, हा प्रश्नच आहे. एका शेतक-यांच्या शेतातील परिस्थिती चांगली असली तर दुस-या शेतात तिच परिस्थिती राहील, याची शाश्वती नसते. त्यामुळे उत्पादनही सारखे राहत नाही़

माझ्या ४ एकर शेतात कपाशीचे पीक असून ते केवळ ७ फुट उंच वाढले परंतु अल्प बोंड असल्यामुळे याचा चांगला फटका बसणार असून शासनाकडून  मदतीची अपेक्षा आहे -हानमंतु यंबडवार, शेतकरी बिलोली़  

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती