शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

माणूसभर उंचीच्या कपाशीला बोंडे नगण्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 13:05 IST

शेतक-यांना यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देअति पावसामुळे वाढ खुंटण्यासोबतच उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत़

बिलोली : शेतात उंचच उंच वाढलेल्या कपाशीत प्रवेश केल्यानंतर माणुसही दिसणार नाही, असे चित्र दिसत़ ८० ते ९० बोंड असतील आणि २० क्विंटल उत्पादन होईल अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली आहे़ एवढी वाढ होवूनही या कपाशीला मोजकेच बोंडे लागली आहेत़बहुतांश ठिकाणी उंच वाढलेल्या कपाशीला मोजकीच बोंड असून काही ठिकाणी ना कपाशी वाढली ना बोंडाची संख्या  वाढली, अशी परिस्थिती आहे.त्यामुळे शेतक-यांना माञ यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे.

यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत़ सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जवळपास दीड महिना सातत्यपुर्ण पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसानेही जाता जाता शेतक-यांना दणका दिला. मध्यंतरीच्या काळात काही भागात कपाशीचे पीक जोमाने वाढले. हिरवीकच उंचच उंच वाढलेली आणि दाटीवाटीने बहरलेली कपाशी पाहून कुणालाही एकरी १५ ते १६ क्विंटल उत्पन्न होईल, असाच भास होतो. पण, कपाशीत गेल्यानंतर माञ परिस्थिती वेगळीच दिसते. उंच वाढलेल्या कपाशीला केवळ दहा ते पंधरा बोंड आहे, नव्याने पाती नावालाच आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट असुन निम्मेही उत्पादन होईल किंवा नाही, याबाबत शेतक-यांना शंका आहे. त्यात अत्यल्प अनुदानानेही निराशा केली आहे़

सरसकट मदत देण्याची गरजपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.प्रशासनाने आणेवारी कोणत्या पध्दतीने काढली ते कळायला मार्ग नाही. शेतक-यांना सरसकट मदत देण्याची गरज आहे असे बिलोली तालुक्यातल्या असंख्य शेतक-यांनी केली आहे.कधी अधिक फरकाने सर्वच शेतक-यांची परिस्थिती सारखी आहे. काहींच्या शेतातील कपाशी तीन ते चार फुटांच्या वर वाढलेली नाही. या कपाशीलाही कुठे दोन,कुठे तीन तर कुठे जास्तीत जास्त दहा ते पंधरा बोंड आहेत.त्यामुळे सर्वञच कपाशीच्या उत्पन्नाबाबत विदारक परिस्थिती आहे. 

हे नुकसान कुठुन भरुन काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या आणेवारीत सुबत्ता दाखविली आहे. पण, ही सुबत्ता कुठे दिसली, हा प्रश्नच आहे. एका शेतक-यांच्या शेतातील परिस्थिती चांगली असली तर दुस-या शेतात तिच परिस्थिती राहील, याची शाश्वती नसते. त्यामुळे उत्पादनही सारखे राहत नाही़

माझ्या ४ एकर शेतात कपाशीचे पीक असून ते केवळ ७ फुट उंच वाढले परंतु अल्प बोंड असल्यामुळे याचा चांगला फटका बसणार असून शासनाकडून  मदतीची अपेक्षा आहे -हानमंतु यंबडवार, शेतकरी बिलोली़  

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती