शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

भाजपामुळे देशात अराजकतेची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:36 IST

भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार

ठळक मुद्देकुमार केतकर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी

नांदेड : भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी नांदेडमध्ये व्यक्त केले.जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात खा. केतकर यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये देशवासियांनी मोदींच्या हातात सत्ता दिली. मात्र जनतेचा भ्रमनिरासही झाला. ज्या घोषणा सत्ता येण्यापूर्वी भाजपाने केल्या होत्या. त्यातील किती योजनांची अंमलबजावणी झाली हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे देशात सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. अराजकता निर्माण झाली. सरकारविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आला. मोदी आणि अमित शहा यांनी सर्व नियम व स्वातंत्र्य मोडीत काढत हुकूमशाही आणली आहे. या दोघांनाही संसदेचा अभ्यास आणि अनुभव नसल्याचेही केतकर म्हणाले. देशात रोजगाराचा प्रश्न ‘जैसे थे’आहे. नोटाबंदीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या काळ्या पैशाच्या गोष्टी भाजपाने केल्या होत्या. तो काळा पैसा आलाच नाही. उलट नोटाबंदीच्या निर्णयाने अनेकांचा रोजगार हिरावला. इंदिरा गांधी यांच्या काळात संसदेचे सभागृह १६० ते १७० दिवस चालायचे. मोदींच्या काळात मात्र ते ६० ते ७० दिवसच चालत आहे. मोदींना अधिवेशन नको असते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. २०१९ च्या निकालानंतर कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान विराजमान झाला तरी त्याला येणारे धोके झेलावे लागतील, ंअसेही ते म्हणाले.

  • काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीसाठी घोषित केलेला जाहीरनामा नेहमीपेक्षा वेगळा आहे. हा जाहीरनामा तयार करताना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे ख-या अर्थाने जनतेचा जाहीरनामा आहे, असे सांगत काँग्र्रेसची सत्ता आल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा