शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

भाजपामुळे देशात अराजकतेची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:36 IST

भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार

ठळक मुद्देकुमार केतकर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी

नांदेड : भाजपच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण झाली. सर्वच स्तरांत नैराश्य पसरले असून येणाऱ्या काळात देशाला मोठे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी नांदेडमध्ये व्यक्त केले.जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात खा. केतकर यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये देशवासियांनी मोदींच्या हातात सत्ता दिली. मात्र जनतेचा भ्रमनिरासही झाला. ज्या घोषणा सत्ता येण्यापूर्वी भाजपाने केल्या होत्या. त्यातील किती योजनांची अंमलबजावणी झाली हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे देशात सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. अराजकता निर्माण झाली. सरकारविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोह ठरविण्यात आला. मोदी आणि अमित शहा यांनी सर्व नियम व स्वातंत्र्य मोडीत काढत हुकूमशाही आणली आहे. या दोघांनाही संसदेचा अभ्यास आणि अनुभव नसल्याचेही केतकर म्हणाले. देशात रोजगाराचा प्रश्न ‘जैसे थे’आहे. नोटाबंदीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या काळ्या पैशाच्या गोष्टी भाजपाने केल्या होत्या. तो काळा पैसा आलाच नाही. उलट नोटाबंदीच्या निर्णयाने अनेकांचा रोजगार हिरावला. इंदिरा गांधी यांच्या काळात संसदेचे सभागृह १६० ते १७० दिवस चालायचे. मोदींच्या काळात मात्र ते ६० ते ७० दिवसच चालत आहे. मोदींना अधिवेशन नको असते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. २०१९ च्या निकालानंतर कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान विराजमान झाला तरी त्याला येणारे धोके झेलावे लागतील, ंअसेही ते म्हणाले.

  • काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीसाठी घोषित केलेला जाहीरनामा नेहमीपेक्षा वेगळा आहे. हा जाहीरनामा तयार करताना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली आहेत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे ख-या अर्थाने जनतेचा जाहीरनामा आहे, असे सांगत काँग्र्रेसची सत्ता आल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा