शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:02 IST

मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी डागली तोफ पुलवामा सैनिकांचे यश, त्यावर राजकीय पोळी भाजू नका

अर्धापूर : मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. जनतेला दिलेल्या थापामुळे भाजपाच्या हातातून तीन राज्ये गेली. रमण गए, राणी गई, गए शिवराज मामा-अब जल्दही बंद होगा चाय वाले का ड्रामा़़़ अशा शब्दात विरोधकांवर प्रहार करीत पुलवामा घटनेबाबतीत भाजपावाल्यांनी राजकारण करु नये. पाकिस्तानच्या भूमीवर मिळविलेले यश हे सैनिकांचे असल्याचेही सुनावले.२ मार्च रोजी नगरपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, वाचनालय, व्यापारी संकुल, केशवराज मंदिर सुशोभिकरण, सी़सी़रस्ता अशा विविध विकासकामाचा प्रारंभ व बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी चेअरमन गणपतराव तिडके होते. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शहरातील विविध विकासकामे व योजनांविषयी माहिती दिली. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्यात अजून कर्जमाफी चालूच आहे. दुधाला, भाजीपाल्याला भाव नसल्याने तो रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा थेट आरोपही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केला. येणाऱ्या निवडणुकीत महाआघाडी शिवसेना-भाजपाचा एकजुटीने पराभव करणार असून देशातील वातावरण बदलले आहे. याचा प्रत्यय लवकरच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, भोकर तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, मुदखेड तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, संजय लहानकर, पप्पू पाटील कोंढेकर, जि.प. सभापती शिला निखाते, जि.प.सदस्य संगीता अटकोरे, सभापती मंगल स्वामी, शमीम अब्दुला, जहागीरदार, नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, आखतरउल्ला बेग, डॉ़ पल्लवी लंगडे, काँग्रेस शहराध्यक्ष राजू शेट्टे, पंडितराव लंगडे, नासेर खान, मुसव्वीर खतिब व सर्व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख यांच्या बंधुचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या घरी अशोकराव चव्हाणांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धापूर शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस