शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

थापेबाजीमुळेच भाजपाची विश्वासार्हता संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:02 IST

मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी डागली तोफ पुलवामा सैनिकांचे यश, त्यावर राजकीय पोळी भाजू नका

अर्धापूर : मी शब्द दिल्याप्रमाणे शहरातील ३८ कोटींच्या विकासकामे प्रारंभाने अर्धापूर शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले. जनतेला दिलेल्या थापामुळे भाजपाच्या हातातून तीन राज्ये गेली. रमण गए, राणी गई, गए शिवराज मामा-अब जल्दही बंद होगा चाय वाले का ड्रामा़़़ अशा शब्दात विरोधकांवर प्रहार करीत पुलवामा घटनेबाबतीत भाजपावाल्यांनी राजकारण करु नये. पाकिस्तानच्या भूमीवर मिळविलेले यश हे सैनिकांचे असल्याचेही सुनावले.२ मार्च रोजी नगरपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, वाचनालय, व्यापारी संकुल, केशवराज मंदिर सुशोभिकरण, सी़सी़रस्ता अशा विविध विकासकामाचा प्रारंभ व बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा खा़अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी चेअरमन गणपतराव तिडके होते. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात शहरातील विविध विकासकामे व योजनांविषयी माहिती दिली. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, राज्यात अजून कर्जमाफी चालूच आहे. दुधाला, भाजीपाल्याला भाव नसल्याने तो रस्त्यावर फेकून द्यावा लागत आहे. आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा थेट आरोपही अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केला. येणाऱ्या निवडणुकीत महाआघाडी शिवसेना-भाजपाचा एकजुटीने पराभव करणार असून देशातील वातावरण बदलले आहे. याचा प्रत्यय लवकरच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, भोकर तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, मुदखेड तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, संजय लहानकर, पप्पू पाटील कोंढेकर, जि.प. सभापती शिला निखाते, जि.प.सदस्य संगीता अटकोरे, सभापती मंगल स्वामी, शमीम अब्दुला, जहागीरदार, नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, आखतरउल्ला बेग, डॉ़ पल्लवी लंगडे, काँग्रेस शहराध्यक्ष राजू शेट्टे, पंडितराव लंगडे, नासेर खान, मुसव्वीर खतिब व सर्व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष देवराये यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख यांच्या बंधुचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या घरी अशोकराव चव्हाणांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धापूर शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस