शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:04 IST

राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत.

ठळक मुद्देआघाडीबाबत सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षितसोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात निर्णायक चर्चा

- विशाल सोनटक्के 

नांदेड : राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात निर्णायक चर्चा होईल. मात्र राज्यात महाशिवआघाडी उभी राहू नये यासाठी भाजप कसून प्रयत्न करीत असल्याचे सांगत राज्यावर पुन्हा निवडणूक लादण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. 

चव्हाण यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडलेला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेले खरिपाचे पीक वाया गेले आहे. वेळेत मदत मिळाली नाही तर रबी हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरेने नुकसानभरपाई तसेच मदत मिळावी, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. मराठवाड्याकडे तर कोणाचे लक्षच नाही. मागील ११ महिन्यांत एकट्या नांदेड जिल्ह्यात १०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मागील तीन वर्षांत मुख्यमंत्री अनेकदा नांदेड तसेच मराठवाड्यात येऊन गेले. मात्र त्यांना शेतकऱ्यांबाबत कसलाच कळवळा नसल्याची टीका त्यांनी केली.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चर्चा सकारात्मक असून शिवसेना, राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्री आणि काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास उपमुख्यमंत्री पद काँग्रेसकडे राहण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी व्हायचे की नाही? याचा अंतिम निर्णयही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच घेतील, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

घाईघाईने राष्ट्रपती राजवट लागू केलीसरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पुरेसा अवधी दिला नाही. राष्ट्रवादीला दिलेली वेळ संपण्यापूर्वीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव पाठविला. खरे तर सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता होती. मात्र शेवटी तिघे मिळून एकत्रित येत आहेत. हे लक्षात आल्यानंतर घाईघाईने राष्ट्रपती राजवट लागू केली. सध्या कोणालाच निवडणूक नको आहे. राज्याला ती परवडणारीही नाही. परंतु इतरांचे सरकार सत्तेत येऊ नये. यासाठी आघाडीच्या सत्तास्थापनेत अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPoliticsराजकारणBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र