शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

माऊलीची माया होता माझा भीमराया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:38 IST

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़.

नांदेड : माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़ शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लाखो भीम अनुयायांनी मध्यरात्रीपासून अभिवादनासाठी रांगा लावल्या होत्या.‘चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया’ हीच भावना प्रत्येक भीम अनुयायाच्या मनात होती.दीनदलित, उपेक्षित आणि वंचितांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी तत्कालीन वर्णव्यवस्थेविरूद्ध बंड पुकारत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले़ आपल्या उद्धारकर्त्या बाबांना अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले़ शहरातील बुद्धविहारात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ रविवारी सकाळी पंचशील ध्वजारोहण, त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले़ अनेक ठिकाणी धम्मदेसनेचे कार्यक्रमही झाले़ भीमजयंतीनिमित्त अन्नदान करण्यात आले़ रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता लाखो भीमअनुयायी जिल्हाभरातून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी उपस्थित राहिले़ यामध्ये लहानथोर, वृद्ध, महिलांचा समावेश होता़ जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातून दुपारी २ वाजेपासूनच मिरवणुकांना प्रारंभ झाला़ मिरवणुकीत उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, सोनियाची उगवली सकाळ, आले जगी भीमराया, धन्य ते भीमराव आंबेडकर आदी गीतांवर तरूणाईने ठेका धरला होता़ शहरात ठिकठिकाणी निळ्या पताका तसेच निळे ध्वज लावण्यात आले होते़ रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती़महिलांनी काढली अभिवादन रॅलीभारतरत्न डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासूनच शहरातील विविध भागातून दुचाकी रॅली काढण्यात आल्या़ तर रविवारी सकाळी महिलांनीही आकर्षक निळे फेटे बांधून डॉ़आंबेडकर पुतळ्यापर्यंत दुचाकी रॅली काढल्या़ या रॅलीला महिला, युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला़ आंबेडकरी विचारांच्या घोषणात महिला, युवतीने काढलेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते़फटाक्यांची आकर्षक आतषबाजीभारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हजारो अनुयायांनी गर्दी केली होती़ रात्री बाराच्या ठोक्याला आकाशात आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ यावेळी अनुयायांनी दिलेल्या ‘जयभीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ रात्री अकरा वाजेपासूनच अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्याजवळ जमत होते़ रात्री बारा वाजता तर हा परिसर गर्दीने फुलून गेला होता़दोन दिवसांपासून पोलीस रस्त्यावरलोकसभा निवडणुकीत दररोज नांदेड जिल्ह्यात राज्य आणि देशभरातील दिग्गजांच्या सभा होत आहेत़ त्यामुळे या सभांसाठी दररोज पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत आहे़ त्यात रात्रपाळीतही गस्त घालणे, वाहनांची तपासणी सुरुच आहे़ त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला होता़ त्यात १३ एप्रिल रोजी रामनवमी आणि १४ एप्रिल रोजी डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असल्यामुळे या दोन्ही दिवशी जवळपास अडीच हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी नांदेड शहरात तैनात करण्यात आले होते़ तर दुसरीकडे नेत्यांच्या सभास्थळीही पोलीस तैनात होते़ त्यानंतर १५ एप्रिल रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़राहुल गांधी यांची नांदेडात सभा होणार आहे़ त्यामुळे या ठिकाणीही सकाळपासूनच पोलीस यंत्रणेला डोळ्यात तेल घालून दक्ष रहावे लागणार आहे़ सलग बंदोबस्तामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे़ पोलीस अधीक्षक संजय जाधव हे स्वत: सर्व ठिकाणच्या बंदोबस्ताचे नियोजन करीत आहेत़ नांदेड पोलिसांच्या दिमतीला परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतून फौजफाटा मागविण्यात आला आहे़ त्याचबरोबर एसआरपीएफच्या कंपन्याही नांदेडात तळ ठोकून आहेत़

टॅग्स :NandedनांदेडDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीNanded policeनांदेड पोलीस