शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

देगलुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनानंतर राहुल गांधीं करणार मशाल मार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:53 IST

भारत जोडो यात्रेचे देगलूरमध्ये आज आगमन; माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पूर्ण

नांदेड :  काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या ‘भारत जाेडाे’ यात्रेचे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास देगलूर येथे आगमन होणार आहे. या यात्रेेच्या स्वागतासाठी नांदेड काँग्रेस सज्ज झाली असून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेससह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नांदेडात मुक्कामी आले आहेत. 

खा. राहुल गांधी यांची ‘भारत जाेडाे’ यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात येणार आहे. तेलगंणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला आणि महापुरूषांच्या प्रतिमांना अभिवादन करून यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, राहुल गांधी यांचे भाषण होईल. रात्री ९ वाजता देगलूर ते वन्नाळी गुरूद्वारापर्यंत पदयात्रा राहील. यावेळी राहुल गांधी यांच्यासह पदयात्री हातात पेटती मशाल घेऊन चालतील. 

वन्नाळी येथील गुरूद्वारा यादगार साहिबजादे बाबा जाेरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर श्री गुरूनानक देवजी यांचे गुरूपुरब अरदास केली जाईल. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता वन्नाळी गुरूद्वारा येथून पदयात्रेला पुन्हा प्रारंभ हाेईल. दुपारी पदयात्रेसाठी वझरगा येथे राखीव वेळ आहे.  दुपारी ३ वाजता खतगाव फाटा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. सायंकाळी साडेपाच वाजता पदयात्रा भाेपाळा येथे पाेहाेचल्यानंतर काॅर्नर बैठक घेतील. बुधवारी सकाळी ५:४५ वाजता शंकरनगर रामतीर्थ येथून प्रारंभ होईल. नायगाव येथील दुपारचा वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता नायगाव येथील कुसुम लाॅन्स येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. सायंकाळी साडेपाच वाजता खा. राहुल गांधी यांची कृष्णूर एमआयडीसी येथे काॅर्नर बैठक हाेईल.

गुरुवारी होणार नांदेड शहरात आगमन- गुरुवारी सकाळी पावणेपाच वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. दुपारी चंदासिंघ काॅर्नर (नांदेड) येथे पदयात्रा पाेहाेचल्यानंतर वेळ राखीव आहे. पुढे दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका येथून पदयात्रेला प्रारंभ हाेईल. - ही पदयात्रा शहरातून नांदेडच्या नवा माेंढा मैदानावर पाेहाेचेल. याठिकाणी सायंकाळी खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा आणि रात्री  पिंपळगाव महादेव येथे मुक्काम होईल. शुक्रवारी सकाळी ५:४५ वाजता पदयात्रेला दाभड येथून प्रारंभ हाेईल. - पदयात्रा काळात दुपारी पार्डी मक्ता येथील स्वामी फार्म हाऊस येथे राखीव. त्यानंतर दुपारी ३ वाजता चाेरंबा फाटा येथून पदयात्रेस प्रारंभ हाेऊन ही पदयात्रा हिंगाेलीकडे प्रयाण करणार आहे.

भारत जोडो यात्रेत तीन कॅम्पभारत जोडो यात्रेतील पहिल्या कॅम्पमध्ये खासदार राहुल गांधी, केंद्रीय पातळीवरील नेते असतील. ते सर्व सुविधा असलेल्या कंटेनरमध्ये मुक्काम करतील. कॅम्प नंबर २ हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा असेल, त्याठिकाणी प्रदेश पातळीवर नेते राहतील. याठिकाणी १ हजार पदयात्रींची व्यवस्था केलेली आहे, तर कॅम्प क्रमांक तीनमध्ये पदयात्रींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. 

भारत जोडो यात्रा लोकचळवळ बनली-  अशोकराव चव्हाण‘भारत जोडो’ यात्रा ही एक लोकचळवळ बनली आहे. हा एकप्रकारे स्वातंत्र्याचा दुसरा लढा असून, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे सामान्यांना भेटत आहेत, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. त्यातूनच ही यात्रा लोकचळवळ बनत गेल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. सामाजिक क्रांती घडविण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून, भारत जोडो यात्रा निश्चित लोकशाही वाचविण्यासाठी  क्रांती घडवेल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNandedनांदेड