शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

परराज्यांतून येणाऱ्या मिठाईपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:54 IST

गतवर्षी सापडली होती भेसळयुक्त बर्फी

ठळक मुद्देग्राहकांनो सावधान गणेश मंडळानी विशेष खबरदारी घ्यावी

नांदेड : सण-उत्सव काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेवून काही दुकानदार, व्यावसायिकांकडून भेसळयुक्त मिठाई विकण्याचा प्रयत्न केला जावू शकतो़ गतवर्षी गणपती-गौरी सणाच्या काळात जवळपास १ क्विंटल भेसळयुक्त बर्फी जप्त केली होती़ यंदा अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाईचे जवळपास ३८ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़  

नांदेड जिल्ह्यात दुधाचे उत्पादन गरजेप्रमाणे आहे़ त्यामुळे मिठाई व तत्सम पदार्थांसाठी लागणारे दूध, खव्वा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो़ परिणामी भेसळ होण्याला फारसा वाव मिळत नाही़ आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या तपासणीमध्ये कुठेही भेसळयुक्त मिठाई आढळून आली नाही़ स्थानिक मिठाई उत्पादक, विक्रेते यांच्याकडून भेसळ केली जात नसली तरी गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतून येणाऱ्या स्पेशल मिठाईमध्ये भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही़  गतवर्षी अन्न व औषध प्रशासन विभागाने गणपती- गौरी उत्सवाच्या काळात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुजरातची स्पेशल बर्फी पकडण्यात आली होती़ या मिठाईमध्ये भेसळ असल्याचे आणि मानवी शरीरासाठी घातक असणारे केमिकल वापरले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवळपास १ क्विंटल बर्फी नष्ट करण्यात आली होती़ त्यामुळे सण-उत्सव काळात वाढती मागणी लक्षात घेवून बाहेरची बर्फी, पेढा व इतर गोड पदार्थ व्यापारी आयात करू शकतात़ बाहेरून येणाऱ्या मिठाई, गोड खाद्यपदार्थासंदर्भात काळजी घ्यावी़ यामध्ये शिंगाडा पीठ, ताज, मैदामिश्रित मिठाई आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच त्यात वापरले जाणारे रंग शरीरासाठी घातक असतात़ सदर पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ 

गणेश मंडळानी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले  आहे़ त्यासाठी प्रसाद उत्पादनाची जागा स्वच्छ असावी, प्रसादाला लागणारी भांडी स्वच्छ आरोग्यदायी व झाकण असलेली असावी, आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी,  प्रसाद बनविताना लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे, कच्च्या मालाचा घटकपदार्थ परवानाधारक अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत व त्यांचे खरेदी बिल जतन करुन ठेवावेत. मिठाई, पेढे आदी प्रसादाचे पदार्थ झाकून ठेवावेत व जंतूसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ 

श्री गणेश मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावीश्री गणेश उत्सवानिमित्ताने विविध गणेश मंडळाकडून प्रसाद तयार करुन भाविकांना वाटप करण्यात येतो. त्यामुळे गणेश मंडळांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करावी़ सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिक यांनी अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने पालन करणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जात असून आजपर्यंत संशयित ठिकाणच्या जवळपास ३८ मिठाई नमुन्यांची तपासणी केली आहे़               - टी़ सी. बोराळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासऩ

टॅग्स :NandedनांदेडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागCrime Newsगुन्हेगारी