शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:50 IST

भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले.

ठळक मुद्देआरिफ खान यांचे आवाहन

नांदेड : भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्याकासह बहुजन समाजावरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन माजी मंत्री आ. मोहंमद आरिफ नसीम खान यांनी केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी अन्यथा या विभाजनाचा भाजपालाच फायदा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.नसिम खान हे शनिवारी नांदेडमध्ये काँग्रेस प्रचारार्थ आले होते. नवामोंढा येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या ध्येयधोरणावर त्यांनी कडाडून टीका केली. गेल्या पाच वर्षांच्या काळात केंद्र आणि राज्यात भाजप सरकारने अल्पसंख्याक समाजावर मोठा अन्याय केला आहे. त्याचवेळी दलित, ओबीसी, मागासवर्गीय समाजावरही हीच परिस्थिती होती. त्यामुळे अल्पसंख्याकांसह दलित, बहुजन हे काँग्रेससोबत असल्याचा दावाही नसीम खान यांनी केला.वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करुनही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतला नाही. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असली तरीही त्याचा काँग्रेसवर परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. त्याचवेळी बहुजन समाज पक्ष, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून आरएसएस बाबत चुप्पी साधली आहे. दुसरीकडे काँग्रेसवर मात्र टीका केली जात आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार आरएसएस चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर शादीखाना योजना, उर्दू घरांची संकल्पना बंद केली आहे. मुस्लिम समाजातील अनेक बिरादरींचे आरक्षण रोखले आहे. मुस्लिम आणि मराठा समाजाने आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले होते. तरीही मुस्लिमांना आरक्षण दिले नाही. धनगर समाज भाजपासोबत होता. मात्र आरक्षणाच्या विषयावरुन तो आता भाजप सरकारवर नाराज आहेत. या परिस्थितीत भाजपाला धडा शिकविण्याच्या तयारीत मतदार दिसून येत आहेत. मात्र मतदान करताना पुरोगामी धर्म निरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होणार नाही आणि याचा फायदा पुन्हा जातीयवादी शक्तींना मिळणार नाही, याची दक्षता घ्या, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला लियाकत अन्सारी, अब्दुल हाफीज, जमी कुरेशी, सलाम चावलवाला, स्थायी समितीचे सभापती फारुख अली खान, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकSocialसामाजिकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक