शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड नियोजनात वर्चस्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:59 IST

बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़

ठळक मुद्देकाँग्रेस-सेना हातघाईवरगोंधळामुळे गाजली ‘डीपीडीसी’ ची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्या नियोजन समितीची सोमवारची बैठक वादळी ठरली़ बैठकीत काँग्रेस आणि सेना पदाधिकाऱ्यांत विकासकामांच्या निधीवरुन वर्चस्वाची लढाई दिसून आली़ या गोंधळातच पालकमंत्री रामदास कदम यांनी बैठक संपल्याचे जाहीर केल्याने काँग्रेस पदाधिकारी संतापले़ विकासकामांवर चर्चा करावी, असा त्यांचा आग्रह होता़ बैठकीतनंतर काँग्रेस आ़ अमरनाथ राजूरकर आणि सेना आ़ हेमंत पाटील यांच्यातही बाचाबाची झाली़ यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत डीपीडीसीतील १२ कोटींच्या निधीचा मुद्दा कळीचा ठरला़ सदर निधीतून लोकप्रतिनिधींनी दिलेली कामेच घ्यावी़ यासाठी सर्वसमावेशक निर्णय व्हावा, असा आ़डी़पी़सावंत आणि आ़ अमरनाथ राजूरकर यांचा आग्रह होता़ तर निर्णय झाला आहे, पुन्हा तोच तो विषय काढू नका असे सांगत पालकमंत्री पुढील विषयाकडे वळत होते़ यातूनच सभागृहातील वातावरण पेटण्यास सुरुवात झाली़धर्माबादसाठी १२ कोटींचा निधी शासनाकडून आणत आहात ते चांगलेच आहे़ मात्र मार्चपूर्वी तो निधी येण्याची गॅरंटी काय ? असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जात होता़ मात्र यावर पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ हा वाद वाढतच गेला़ काँग्रेस सदस्यांनी आमच्या अधिकारावर आपण गदा आणत असल्याचे सांगत, सदस्यांनी दिलेली कामेच घ्यावीत, असा आग्रह धरला़ याच गदारोळात पालकमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांची घोषणा केली़ याबरोबरच विद्युत रोहित्रासाठी दिलेला प्रस्ताव मंजूर करीत याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देवून सभा संपल्याचे जाहीर केले़ पालकमंत्र्यांच्या या कृतीचा विरोध करीत सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली़ पालकमंत्री गेले तरी आम्ही सभा पुढे चालवू, असे आव्हान सदस्यांनी दिल्यानंतर सभा चालवूनच दाखवा असे सांगत घोषणाबाजी करणाºया चार सदस्यांना निलंबित करण्याचे आदेश देवून पालकमंत्री रामदास कदम हे सभागृहाबाहेर पडले़ यावेळी काँग्रेससह इतर विरोधी सदस्यांनी या कृतीच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरु केली़ या गोंधळातच आ़अमरनाथ राजूरकर आणि आ़ हेमंत पाटील यांच्यात बाचाबाची झाली़ यावेळी पालकमंत्री रामदास कदम यांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार खपवून घेणार नाही, असे सुनावले़ तर पालकमंत्री म्हणून चुकीचा पायंडा पाडत आहात़ जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे असा आग्रह आ़राजूरकर यांचा होता. या वादविवादानंतर पालकमंत्री कदम आणि आ़अमरनाथ राजूरकर यांच्यात बंद खोलीमध्ये चर्चा होवून पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडले़

डीपीडीसी ही जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करुन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे या समितीच्या बैठका नियमित झाल्या पाहिजेत़ लोकनियुक्त पदाधिकाºयांची भूमिका लक्षात घेवून आराखडा तयार केला पाहिजे़ मात्र तसे होत नाही़ सभागृहात वारंवार सदस्यांना निलंबित करण्याची धमकी देवून निवडून आलेल्या सदस्यांचा अपमान करण्याचा प्रयोग पालकमंत्र्यांनी केला आहे़ त्यांचे आजचे वर्तन म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होय. - आ़ डी़ पी़ सावंत

पालकमंत्र्यांवर अपशब्द वापरल्याचा आरोपबैठकीत उमरी येथील नगरसेविका दीपाली मामीडवार यांनी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा नसल्याने पाच गावे तेलंगणात जाण्याची मागणी करीत असल्याचे सांगताच पालकमंत्री संतापले़ महाराष्ट्राचा काही स्वाभिमान आहे की नाही ? सभागृहात राज्याचा अवमान सहन करणार नाही, अशा धमक्या देण्याऐवजी जायचे असेल तर खुशाल तेलंगणात जा, अशा शब्दात त्यांनी मामीडवार यांना सुनावले़ बैठकीनंतर याच विषयावरुन झालेल्या चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे़ मात्र त्यांनी तो फेटाळला़

आपल्या इच्छेनुसार व सोयीनुसार नियोजन मंडळाची बैठक न झाल्यानेच काँग्रेस सदस्यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत गोंधळ घातला़ मात्र , कुठलीही बेशिस्त आपण खपवून घेणार नाही, कुठल्याही महिलेचा अपमान केला नसून, आजही आपलीच सत्ता असल्यासारखे वागणा-या काँग्रेसला लगाम घालण्याचा प्रयत्न केला़ सभागृहात गोंधळ घालून काँग्रेस सदस्यच विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न करीत होते़ या गोंधळाला व दबावतंत्राला मी झुकलो नाही़ - रामदास कदम, पालकमंत्री

बैठक गुंडाळल्याने महत्त्वाचे मुद्दे बाजूलानांदेड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री आणि आमदारांमध्ये गोंधळ उडाला़ त्यामुळे लगेचच बैठक गुंडाळल्याने महत्त्वाचे मुद्दे बैठकीत मांडता आले नसल्याची खंत मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ़ अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली़नांदेड जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे़ बारावीपर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत ५३ टक्के मुलींची शिक्षणातून गळती होते़ नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले़ आठवीपर्यंतची गळती २७ टक्के आहे तर जवळपास ५० टक्के मुली बारावीपर्यंत पोहोचत नाहीत़ या वयात मुलींचे लग्न म्हणजेच बालविवाह होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असून बालविवाह व दुरावलेले शिक्षण या दोन्ही बाबी तिच्या आरोग्यावर परिणाम करतात़ त्यातून उद्भवणाºया अडचणी विकासाला अडसर ठरत आहेत़ त्यामुळे शासनाने त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ़ बेलखोडे यांनी केली़ तालुका सोडून जिथे मुली शिक्षण घेतात तिथे सर्व जाती-धर्मातील मुलींसाठी वसतिगृह उभारावीत, त्यांच्या सुरक्षिततेसह योग्य सुविधा देवून शिक्षणातील मुलींची गळती थांबविण्याची मागणी डॉ़बेलखोडे यांनी केली़ तसेच मांडवी येथील खान अब्दुल गफार खान नेत्र रूग्णालयाच्या इमारत दुरूस्तीसाठी निधी मंजूर करावा, किनवट तालुक्यातील अतिदुर्गम गावे रस्त्यांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, किनवट येथे शासकीय नर्सिंग स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे़ त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करावा, आदी मागण्या डॉ़ बेलखोडे यांनी केल्या़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदRamdas Kadamरामदास कदमcongressकाँग्रेस