शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

नापिकी, कर्जबाजारीपणाने नैराश्य; गुढी पाडव्यादिवशीच शेतकऱ्याने संपवले जीवन

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: March 22, 2023 19:18 IST

शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे?

मारतळा (जि. नांदेड) : लोहा तालुक्यातील हातणी येथील एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. ही दुर्घटना २२ मार्च रोजी गुढी पाडव्यादिवशी सकाळी घडली.

हातणी (ता. लोहा) येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश दादाराव कदम (वय २८) याने सततची नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

उस्माननगर पोलिसांना ही माहिती मिळताच फौजदार प्रभू केंद्रे, जमादार राम कानगुले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.

गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास उस्मान नगर पोलिस करीत आहेत.

एक वर्षापूर्वीच झाले लग्नमृत गणेश याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या नावे तीन एकर शेती असून, त्याच्यावर बँकेचे पीक कर्ज होते. त्यातच तो थकबाकीदार झाला. शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे? या विवंचनेने या तरुण शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपविली.

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या