शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
4
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
5
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
6
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
7
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
8
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
9
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
10
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
11
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
12
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
13
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
14
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
15
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
16
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
17
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
18
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
19
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
20
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बी. कॉम.च्या ६ व्या सेमिस्टरला ५ व्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 17:24 IST

तब्बल दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली. 

लातूर/नांदेड/हिंगोली : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने बी.कॉम. तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरू असून, शुक्रवारी अंकेक्षण-२ (आॅडीटींग-२) या विषयाची सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होती. मात्र परीक्षार्थ्यांना पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरील प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला. नांदेड, लातूरसह विद्यापीठाच्या कक्षेतील सर्वच केंद्रांवर हा प्रकार घडला. दरम्यान, तब्बल दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आली. 

‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत बी.कॉम. तृतीय वर्षाच्या आॅडिटिंग-२ या विषयाची सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होती. मात्र त्यांना पाचव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली. हे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधितांना ही माहिती दिली. त्यानंतर विद्यापीठाने दीड तासानंतर प्रश्नपत्रिका बदलून दिली. दरम्यानच्या काळात परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाला. विशेष म्हणजे बदलून दिलेल्या प्रश्नपत्रिकेतही शेवटचा प्रश्न ५ व्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमावरच विचारला होता. शिवाय, प्रश्नपत्रिकेत अनेक चुका होत्या, असेही परीक्षार्थींनी सांगितले. या भोंगळ कारभारामुळे परीक्षार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 

हिंगोलीतही विद्यार्थ्यांचा गोंधळविद्यापीठाच्या बी.कॉम तृतीय वर्षाच्या परीक्षार्र्थींना जुनीच प्रश्नपत्रिका पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तब्बल तासाभरानंतर विद्यापीठाला चूक उमजली. त्यानंतर नवी प्रश्नपत्रिका पाठवून नव्याने परीक्षा घेण्याची सूचना परीक्षा केंद्रांना केली. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दोन वेळा पेपर सोडविण्याची वेळ आली. 

विद्यार्थ्यांचे नुकसान नाही वाणिज्य शाखेच्या सहाव्या सत्राच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सिलॅबसबाहेरचे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने दुसरा प्रश्नपत्रिका संच देण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी पहिल्या संचावरच परीक्षा देणार असल्याचे सांगत तीच प्रश्नपत्रिका वापरली. ज्यांनी दुसरा संच घेतला त्या विद्यार्थ्यांना नियमानुसार वेळ वाढवून दिला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे कसलेही  नुकसान झाले नाही.- रवि सरोदे, परीक्षा नियंत्रक, स्वारातीम

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडexamपरीक्षाStudentविद्यार्थी