शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समविचारी मतांचे विभाजन टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:21 IST

मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : लोहा, कंधारात पाण्याऐवजी दारुचे वाटप

नांदेड : मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांचे विभाजन झाल्यास भाजपालाच त्याचा फायदा होणार आहे़ त्यामुळे या मतांचे विभाजन टाळण्याची गरज आहे़ विरोधकांचा हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे़ त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे़ असे प्रतिपादन खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ यावेळी चिखलीकरांचे नाव न घेता लोहा-कंधारात पाण्याऐवजी दारुचेच वाटप अधिक वाटप होत असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले़नाळेश्वर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती़ या सभेला आ़डी़पी़सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ़ सुनील कदम, प्रा़प्रकाश पोपळे, हरिभाऊ शेळके, तातेराव पाटील आलेगांवकर, बाजीराव वाघ, सुखदेव जाधव, निलेश पावडे, शीला निखाते, साहेबराव धनगे, शिवाजी पावडे, किशोर पाटील, नरहरी वाघ, माधवराव वाघ, अतुल वाघ यांची उपस्थिती होती़ यावेळी खा़ चव्हाण म्हणाले, देशात शेतकऱ्यांवर भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ या सरकारने आणली़ १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या़ तरी हे सरकार गप्प आहे़ या सरकारला आता मत मागायला लाज कशी वाटत नाही़ तुराटी येथे शेतकºयाने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली़ सर्वसामान्यांच्या हिताच्या सर्व योजना बंद केल्या़ उज्ज्वला गॅस योजना फसवी आहे़ बेरोजगारांचे लोंढे कामाच्या शोधात फिरत आहेत़ परंतु सरकारकडून त्यांची अवहेलनाच होत आहे़ दुष्काळनिधीच्या वाटपातही भाजपाकडून भेदभाव करण्यात येत आहे़ आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र शेतकरी अर्थसंकल्प तसेच किमान वेतन योजनेद्वारे प्रतिवर्षी ७२ हजार रुपये बँक खात्यात टाकले जातील़ दिवंगत शंकरराव चव्हाण व पद्मश्री श्यामराव कदम यांच्यामुळेच विष्णूपुरी, अप्पर पैनगंगा प्रकल्प झालेत़ त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला़ भाजपा उमेदवाराने बंद केलेले कारखाने आम्ही सुुरु करु़ असेही ते म्हणाले़ तर आ़डी़पी़सावंत यांनी सरकारवर घणाघाती टीका करीत भाजपाला अंबानीचा जीओ वाढवायचा आहे असे सांगितले़ शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, व्यापारी, विद्यार्थ्यांची बिकट अवस्था झाली आहे़ आश्वासनांची पूर्तता होत नसल्यामुळे राम मंदिर, देशभक्ती, देशद्रोह यासारखे विषय समोर आणले जात आहेत़मोदींची सत्ता आल्यास मतदानाचा हक्क राहणार नाही, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ़ सुनील कदम म्हणाले. मोदींची सत्ता आल्यास मतदानाचा हक्क राहणार नाही़ बोलण्याच्या अधिकारावरही गदा आणली जात आहे़ राजकारणात मोदी पवारांचे बोट धरुन आले अन् आता त्यांच्याच घराण्याबद्दल बोलत आहेत़ ज्यांना कुटुंब नाही, त्यांनी इतरांच्या कुटुंबाबद्दल बोलू नये.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस