शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

नांदेड जिल्ह्यात आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेला धान्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:45 PM

कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देआश्रमशाळेत जेवणाची सोय नसल्याने विद्यार्थी घरीचजिल्ह्यात १६ शासकीय तर १६ अनुदानित आश्रमशाळा आहेत.

- भारत दाढेल 

नांदेड :   राज्य शासनाने ९ वी ते १२ वी या वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढत आहे. मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य असून आदिवासी आश्रमशाळेतील चित्रही असेच आहे. जिल्ह्यात ४४ आश्रमशाळा सुरू असून वसतीगृहे मात्र अद्याप बंदच आहेत. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा तसेच निधी उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणचे विद्यार्थी अद्याप घरीच बसून आहेत. 

कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळीनंतर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्केच आहे. तर आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थीही आश्रमशाळेत आले नाहीत. काही ठिकाणी अनिवासी आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. मात्र निवासी आश्रमशाळेत धान्य पुरवठा होत नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनुदानित आश्रमशाळेला वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने या आश्रमशाळाही अडचणीत आल्या आहेत. आदिवासी विभागाच्या जिल्ह्यात १६ शासकीय तर १६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या ठिकाणी एका शाळेत सरासरी ४०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या आश्रमशाळा सुरू झाल्या असल्या तरी जेवणाची सोय नसल्याने या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

आश्रमशाळांसमोरील अडचणी कोरोनामुळे मागील आठ, नऊ महिन्यापासून बंद असलेल्या आश्रमशाळा सुरू झाल्या असून आदिवासी विभागाच्या आश्रमशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहाराची सोय होत नसल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अद्याप येत नसल्याचे तसेच अनुदानित आश्रमशाळेला निधी मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

वसतिगृहांसमोरील अडचणी जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे १६ वसतीगृहे असून सध्या तरी हे वसतीगृह बंद अवस्थते आहेत. इयत्ता आठवी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या वसतीगृहात प्रवेश घेतात. एका वसतीगृहाची प्रवेश क्षमता जवळपास १०० असून सर्व वसतीगृहात १ हजार ६०० विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवण्याच्या सोयीसोबतच त्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यात येतात. मात्र हे वसतीगृह सध्या बंद आहेत. 

जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४४ आश्रमशाळा असून या आश्रमशाळा शासन निर्णयानुसार कोरोना विषयक सर्व नियम पाळून सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत असून लवकरच आश्रमशाळेतील उपस्थिती शंभर टक्के होईल.- माळवदकर, समाज कल्याण अधिकारी, नांदेड

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी