शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नांदेडमध्ये रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 18:16 IST

२ हजार ३५ हेक्टरवर गहू, हरभरा आणि ज्वारीची पेरणी

- श्रीनिवास भोसले

नांदेड : परतीचा पाऊस जोरदार झाल्याने सर्व नदी-नाल्यांसह विहिरींना पाणी आले असून जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे़ त्यामुळे यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात दुपटीने वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ 

नांदेड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसासह आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली़ परिणामी, ऐन पावसाळ्यात ज्या विहिरींना पाणी आले नाही त्या विहिरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरल्या आहेत़ सर्वच विहिरी आजघडीला तुडुंब भरलेल्या आहेत़ त्यामुळे हळद व इतर पिकांना पाणी कमी लागेल़ परिणामी, गहू, हरभरा आणि रबीत इतर पिकांना आवश्यकतेनुसार पाणीपाळ्या मिळू शकतात़ त्यामुळे यंदा रबीमध्ये हरभरा आणि गव्हाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे़ आजघडीला रबीच्या पेरण्यांना प्रारंभ झाला आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० हेक्टरवर ज्वारी तर २५० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे़ त्यापाठोपाठ मुदखेडमध्ये १० हेक्टर गहू, २५ हेक्टर हरभरा, नायगाव - २० हेक्टर ज्वारी, ८० हेक्टर हरभरा, बिलोली तालुका - ३० हेक्टर ज्वारी, ३५० हेक्टर हरभरा, धर्माबाद - १० हेक्टर ज्वारी, ४०० हेक्टर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत दोन हजार ३५ हेक्टरवर पेरणी झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे़    

रबीचे तालुकानिहाय सर्वसाधारण क्षेत्र आणि कंसामध्ये प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये  नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ५१२ हेक्टर असून यंदा २५ हजार ४९६ हेक्टर प्रस्तावित आहे़  अर्धापूर - ५ हजार ५७२ (१९ हजार ५३४), मुदखेड - ५ हजार ७२० (७०००), लोहा - ५ हजार १२१ (७ हजार ४४४), कंधार - ७ हजार ४६५ (२४ हजार ७१८), देगलूर - १० हजार १८८ (२९ हजार १२६), मुखेड - १० हजार ६८९ (२५ हजार ७३१), नायगाव - १२ हजार ४८५ (२३ हजार ७२८), बिलोली -१२ हजार ७५२ (२६ हजार ३२६), धर्माबाद - ४ हजार ७५२ (१७ हजार ५००), किनवट - ५ हजार ३८४ (२३ हजार ५००), माहूर - ३ हजार ६३० (१० हजार ५२४), हदगाव - १३ हजार ६५६ (२८ हजार),  हिमायतनगर - १० हजार ५६२(११ हजार ९६२), भोकर - ५ हजार ९३१ (१० हजार) तर उमरी तालुक्यात ४ हजार २९३ सर्वसाधारण क्षेत्र असून प्रस्तावित क्षेत्र ९ हजार ४५० हेक्टर आहे़ जिल्ह्यात एकूण १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर रबीचे सर्वसाधारण क्षेत्र असून यंदा ३ लाख ४९ हेक्टरवर रबीची पेरणी प्रस्तावित आहे़ सदर पेरणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ 

प्रकल्पांतील पाणीसाठ्याने शेतकरी आनंदीनांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावांना येलदरी आणि इसापूर धरणाचे पाणी मिळते़ सदर प्रकल्पांमुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे़ मागील काही वर्षांत दोन्ही प्रकल्प कोरडेठाक राहिल्याने शेतकऱ्यांना केळी, ऊस आदी पिके काढून काढून टाकावी लागली होती; परंतु परतीच्या पावसाने दोन्ही प्रकल्पात मोठा जलसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ विष्णुपुरी आणि येलदरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे तर ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्प ७५ टक्के भरला आहे़ त्यामुळे यंदा सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र