शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राचीन महाराष्ट्राचे स्थान लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:59 IST

प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.

ठळक मुद्देप्रमोद देव यांचे प्रतिपादन

नांदेड : प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते ‘प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार परंपरा’ या विषयावर बोलत होते.आंतरराष्ट्रीय व्यापारातील महाराष्ट्राचा सहभाग हा सातवाहन काळापासून सुरु झाल्याचे आढळते. कोकणातील मांडवगड, चौल, नालासोपारा, कल्याण, हर्णे, वेंगुर्ला आदी बंदरांमधून ग्रीस, रोमन साम्राज्य, इजिप्त आदी प्रदेशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. महाराष्ट्राला या कालखंडात लाभलेले राजकीय स्थैर्य तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांनी व्यापाराला उत्तेजन देण्याच्या धोरणामुळे हे शक्य झाले, असे डॉ. देव म्हणाले.गहू, तांदूळ, मसाले, रेशीम, चंदनाची खेळणी, काचेच्या वस्तू, पाळीव प्राणी आदी वस्तूंचा व्यापार प्राचीन काळात चालायचा असे उल्लेख मिळाल्याचे सांगून ते म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्रात पैठण, तेर, भोकरदन, नेवासा, नाशिक, कोल्हापूर ही शहरे महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. या शहरांना जोडणारे व्यापारी मार्ग अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील अजिंठा, वेरुळसह सर्व लेण्या याच मार्गावर स्थित असून त्यांचा उपयोग हा प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या निवासासाठी होत असे. या लेण्यांच्या उभारणीत राज्यकर्त्यांसोबतच व्यापाºयांचेही योगदान महत्त्वाचे होते आणि याला तत्कालीन महाराष्ट्राच्या समृद्धीचा पुरावा म्हणता येईल, असे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.रोमन साम्राज्यामध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी होती आणि आपण रोमनांकडून तुलनेने फारसे काहीच आयात करत नव्हतो. यामुळे रोमकडून भारताकडे संपत्तीचा ओघ वाढत चालला होता आणि याबद्दल तत्कालीन रोम संसदेमध्ये हा ओघ कसा थांबवता येईल, याची चिंता व्यक्त झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे डॉ. देव म्हणाले.प्राचीन भारतातील व्यापार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवडता विषय होता व इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रात एम. ए. करताना याच विषयावरील प्रबंधलेखनास त्यांनी सुरुवात केली होती; पण पुरेशा संदर्भसाहित्याअभावी त्यांनी विषय बदलला, असेही ते म्हणाले. या विषयाचे अनेक पैलू अजूनही दुर्लक्षित असून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. व्याख्यानानंतर आयोजित चर्चेत प्रवीण सोनी, डॉ. लक्ष्मण मोहरीकर, डॉ. अभय दातार, डॉ. बालाजी चिरडे आदींनी सहभाग घेतला. प्रा. मधुकर राहेगावकर यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन डॉ. सचिन पवार तर डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. श्यामल पत्की, डॉ. प्रभाकर देव, प्रतिभा देव, डॉ. जी.एस. शेळके, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, डॉ. एस. जी. जाधव, डॉ. सुकाळे, डॉ. दत्ता यादव, विठ्ठल निवघेकर, डॉ. प्रमोद लोणारकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र