शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राचीन महाराष्ट्राचे स्थान लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:59 IST

प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.

ठळक मुद्देप्रमोद देव यांचे प्रतिपादन

नांदेड : प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते ‘प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार परंपरा’ या विषयावर बोलत होते.आंतरराष्ट्रीय व्यापारातील महाराष्ट्राचा सहभाग हा सातवाहन काळापासून सुरु झाल्याचे आढळते. कोकणातील मांडवगड, चौल, नालासोपारा, कल्याण, हर्णे, वेंगुर्ला आदी बंदरांमधून ग्रीस, रोमन साम्राज्य, इजिप्त आदी प्रदेशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. महाराष्ट्राला या कालखंडात लाभलेले राजकीय स्थैर्य तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांनी व्यापाराला उत्तेजन देण्याच्या धोरणामुळे हे शक्य झाले, असे डॉ. देव म्हणाले.गहू, तांदूळ, मसाले, रेशीम, चंदनाची खेळणी, काचेच्या वस्तू, पाळीव प्राणी आदी वस्तूंचा व्यापार प्राचीन काळात चालायचा असे उल्लेख मिळाल्याचे सांगून ते म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्रात पैठण, तेर, भोकरदन, नेवासा, नाशिक, कोल्हापूर ही शहरे महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. या शहरांना जोडणारे व्यापारी मार्ग अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील अजिंठा, वेरुळसह सर्व लेण्या याच मार्गावर स्थित असून त्यांचा उपयोग हा प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या निवासासाठी होत असे. या लेण्यांच्या उभारणीत राज्यकर्त्यांसोबतच व्यापाºयांचेही योगदान महत्त्वाचे होते आणि याला तत्कालीन महाराष्ट्राच्या समृद्धीचा पुरावा म्हणता येईल, असे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.रोमन साम्राज्यामध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी होती आणि आपण रोमनांकडून तुलनेने फारसे काहीच आयात करत नव्हतो. यामुळे रोमकडून भारताकडे संपत्तीचा ओघ वाढत चालला होता आणि याबद्दल तत्कालीन रोम संसदेमध्ये हा ओघ कसा थांबवता येईल, याची चिंता व्यक्त झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे डॉ. देव म्हणाले.प्राचीन भारतातील व्यापार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवडता विषय होता व इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रात एम. ए. करताना याच विषयावरील प्रबंधलेखनास त्यांनी सुरुवात केली होती; पण पुरेशा संदर्भसाहित्याअभावी त्यांनी विषय बदलला, असेही ते म्हणाले. या विषयाचे अनेक पैलू अजूनही दुर्लक्षित असून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. व्याख्यानानंतर आयोजित चर्चेत प्रवीण सोनी, डॉ. लक्ष्मण मोहरीकर, डॉ. अभय दातार, डॉ. बालाजी चिरडे आदींनी सहभाग घेतला. प्रा. मधुकर राहेगावकर यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन डॉ. सचिन पवार तर डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. श्यामल पत्की, डॉ. प्रभाकर देव, प्रतिभा देव, डॉ. जी.एस. शेळके, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, डॉ. एस. जी. जाधव, डॉ. सुकाळे, डॉ. दत्ता यादव, विठ्ठल निवघेकर, डॉ. प्रमोद लोणारकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र