शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राचीन महाराष्ट्राचे स्थान लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:59 IST

प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.

ठळक मुद्देप्रमोद देव यांचे प्रतिपादन

नांदेड : प्राचीन काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे स्थान महत्त्वाचे होते आणि यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग लक्षणीय होता, असे प्रतिपादन डॉ. प्रमोद देव यांनी केले.नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते ‘प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार परंपरा’ या विषयावर बोलत होते.आंतरराष्ट्रीय व्यापारातील महाराष्ट्राचा सहभाग हा सातवाहन काळापासून सुरु झाल्याचे आढळते. कोकणातील मांडवगड, चौल, नालासोपारा, कल्याण, हर्णे, वेंगुर्ला आदी बंदरांमधून ग्रीस, रोमन साम्राज्य, इजिप्त आदी प्रदेशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. महाराष्ट्राला या कालखंडात लाभलेले राजकीय स्थैर्य तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांनी व्यापाराला उत्तेजन देण्याच्या धोरणामुळे हे शक्य झाले, असे डॉ. देव म्हणाले.गहू, तांदूळ, मसाले, रेशीम, चंदनाची खेळणी, काचेच्या वस्तू, पाळीव प्राणी आदी वस्तूंचा व्यापार प्राचीन काळात चालायचा असे उल्लेख मिळाल्याचे सांगून ते म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्रात पैठण, तेर, भोकरदन, नेवासा, नाशिक, कोल्हापूर ही शहरे महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. या शहरांना जोडणारे व्यापारी मार्ग अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील अजिंठा, वेरुळसह सर्व लेण्या याच मार्गावर स्थित असून त्यांचा उपयोग हा प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या निवासासाठी होत असे. या लेण्यांच्या उभारणीत राज्यकर्त्यांसोबतच व्यापाºयांचेही योगदान महत्त्वाचे होते आणि याला तत्कालीन महाराष्ट्राच्या समृद्धीचा पुरावा म्हणता येईल, असे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.रोमन साम्राज्यामध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी होती आणि आपण रोमनांकडून तुलनेने फारसे काहीच आयात करत नव्हतो. यामुळे रोमकडून भारताकडे संपत्तीचा ओघ वाढत चालला होता आणि याबद्दल तत्कालीन रोम संसदेमध्ये हा ओघ कसा थांबवता येईल, याची चिंता व्यक्त झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे डॉ. देव म्हणाले.प्राचीन भारतातील व्यापार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवडता विषय होता व इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रात एम. ए. करताना याच विषयावरील प्रबंधलेखनास त्यांनी सुरुवात केली होती; पण पुरेशा संदर्भसाहित्याअभावी त्यांनी विषय बदलला, असेही ते म्हणाले. या विषयाचे अनेक पैलू अजूनही दुर्लक्षित असून त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. व्याख्यानानंतर आयोजित चर्चेत प्रवीण सोनी, डॉ. लक्ष्मण मोहरीकर, डॉ. अभय दातार, डॉ. बालाजी चिरडे आदींनी सहभाग घेतला. प्रा. मधुकर राहेगावकर यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन डॉ. सचिन पवार तर डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. श्यामल पत्की, डॉ. प्रभाकर देव, प्रतिभा देव, डॉ. जी.एस. शेळके, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, डॉ. एस. जी. जाधव, डॉ. सुकाळे, डॉ. दत्ता यादव, विठ्ठल निवघेकर, डॉ. प्रमोद लोणारकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र