शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:32 IST

नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांची जबर टिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जुना मोंढा येथे आयोजित जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशातील मेरठ व जम्मू-कश्मीरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना निषेधार्ह आहे. भाजपच्या काळात मुली व महिला असुरक्षीत असून अत्याचाराच्या घटना ३८ टक्क्यांनी वाढल्या. यावर शासनाचे नियंत्रण नाही. उलट यात भाजप आमदार, पदाधिकारी आरोपी असून त्यांना अटक करण्यास १० ते १५ दिवसांचा वेळ लागतो. एकप्रकारे बलात्काºयांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत असल्याची टिका खा़चव्हाण यांनी केली़ आरएसएसच्या मनावर चालणारे सरकार असून त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे़ संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, काँग्रेस ते कधीही होवू देणार नाही़ सध्या अनेक राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट असून सर्व नोटा कर्नाटकातील निवडणुकीसाठी भाजपने नेल्याचा आरोप केला़ तसेच नोटा नेल्या नसतील तर त्या कुठे गेल्या याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़सभेत बोलताना राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट म्हणाले की, देशात ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत भाजपाला मिळाले. मात्र सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला. नोटबंदी, जीएसटी आदी निर्णयामुळे सामान्य जनता कोंडीत सापडली. आता निवडणुकीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. यावेळी कॉग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात बँकाचे मजबुतीकरण केले. त्यानंतर मनमोहनसिंघ यांनी जगातील बँका दिवाळखोरीत निघाल्या असताना भारतीय अर्थव्यवस्था सक्षम ठेवली, आता मात्र बँकांचा आर्थिक कणा मोडला आहे. आमचाच पैसा आम्हाला मिळत नाही, ज्यांना चौकीदार बनवले तेच आता सोनेवाले सोते रहो, चोरी करनेवाले भागते रहो, असे म्हणत आहेत, असे मोहनप्रकाश म्हणाले. यावेळी माणिकराव ठाकरे, नसीमखान यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणMohan Prakashमोहन प्रकाश