शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:32 IST

नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांची जबर टिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जुना मोंढा येथे आयोजित जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशातील मेरठ व जम्मू-कश्मीरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना निषेधार्ह आहे. भाजपच्या काळात मुली व महिला असुरक्षीत असून अत्याचाराच्या घटना ३८ टक्क्यांनी वाढल्या. यावर शासनाचे नियंत्रण नाही. उलट यात भाजप आमदार, पदाधिकारी आरोपी असून त्यांना अटक करण्यास १० ते १५ दिवसांचा वेळ लागतो. एकप्रकारे बलात्काºयांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत असल्याची टिका खा़चव्हाण यांनी केली़ आरएसएसच्या मनावर चालणारे सरकार असून त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे़ संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, काँग्रेस ते कधीही होवू देणार नाही़ सध्या अनेक राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट असून सर्व नोटा कर्नाटकातील निवडणुकीसाठी भाजपने नेल्याचा आरोप केला़ तसेच नोटा नेल्या नसतील तर त्या कुठे गेल्या याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़सभेत बोलताना राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट म्हणाले की, देशात ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत भाजपाला मिळाले. मात्र सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला. नोटबंदी, जीएसटी आदी निर्णयामुळे सामान्य जनता कोंडीत सापडली. आता निवडणुकीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. यावेळी कॉग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात बँकाचे मजबुतीकरण केले. त्यानंतर मनमोहनसिंघ यांनी जगातील बँका दिवाळखोरीत निघाल्या असताना भारतीय अर्थव्यवस्था सक्षम ठेवली, आता मात्र बँकांचा आर्थिक कणा मोडला आहे. आमचाच पैसा आम्हाला मिळत नाही, ज्यांना चौकीदार बनवले तेच आता सोनेवाले सोते रहो, चोरी करनेवाले भागते रहो, असे म्हणत आहेत, असे मोहनप्रकाश म्हणाले. यावेळी माणिकराव ठाकरे, नसीमखान यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणMohan Prakashमोहन प्रकाश