शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:32 IST

नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांची जबर टिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जुना मोंढा येथे आयोजित जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशातील मेरठ व जम्मू-कश्मीरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना निषेधार्ह आहे. भाजपच्या काळात मुली व महिला असुरक्षीत असून अत्याचाराच्या घटना ३८ टक्क्यांनी वाढल्या. यावर शासनाचे नियंत्रण नाही. उलट यात भाजप आमदार, पदाधिकारी आरोपी असून त्यांना अटक करण्यास १० ते १५ दिवसांचा वेळ लागतो. एकप्रकारे बलात्काºयांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत असल्याची टिका खा़चव्हाण यांनी केली़ आरएसएसच्या मनावर चालणारे सरकार असून त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे़ संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, काँग्रेस ते कधीही होवू देणार नाही़ सध्या अनेक राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट असून सर्व नोटा कर्नाटकातील निवडणुकीसाठी भाजपने नेल्याचा आरोप केला़ तसेच नोटा नेल्या नसतील तर त्या कुठे गेल्या याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़सभेत बोलताना राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट म्हणाले की, देशात ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत भाजपाला मिळाले. मात्र सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला. नोटबंदी, जीएसटी आदी निर्णयामुळे सामान्य जनता कोंडीत सापडली. आता निवडणुकीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. यावेळी कॉग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात बँकाचे मजबुतीकरण केले. त्यानंतर मनमोहनसिंघ यांनी जगातील बँका दिवाळखोरीत निघाल्या असताना भारतीय अर्थव्यवस्था सक्षम ठेवली, आता मात्र बँकांचा आर्थिक कणा मोडला आहे. आमचाच पैसा आम्हाला मिळत नाही, ज्यांना चौकीदार बनवले तेच आता सोनेवाले सोते रहो, चोरी करनेवाले भागते रहो, असे म्हणत आहेत, असे मोहनप्रकाश म्हणाले. यावेळी माणिकराव ठाकरे, नसीमखान यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणMohan Prakashमोहन प्रकाश