शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मजुरांअभावी शेती आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:41 IST

मजुरांची चणचण भासत असल्याने शेतीतील कामे थांबली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते़

ठळक मुद्देशेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

अर्धापूर/ पार्डी : मजुरांची चणचण भासत असल्याने शेतीतील कामे थांबली आहेत़ यामुळे शेतकऱ्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते़ तसेच पिकांची कापणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना अच्छे दिन आले आहेत़अर्धापूर तालुक्यात गतवर्षात पावसाळा सरासरीपेक्षा कमी झाल्याने नदी, नाले, बोअर व विहीर थोड्याफार प्रमाणात पाण्याने भरले होते व इसापूर धरणातून पाच पाणीपाळ्या मिळत असल्याने शेतकºयांनी केळी पिकाला बगल देऊन हळद, ऊस, हरभरा, गहू व ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती़ तसेच या पिकासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने ही पिके जोमात आली़ यामधील हळद, हरभरा व गहू पिके फेब्रुवारी महिन्यात काढणीस आली़मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतीतील कामे लवकर करण्यासाठी मजुरांची मनधरणी करावी लागत आहे़ अर्धापूर तालुक्यात निमगाव, चोरंबा, कारवाडी, देळूब, शेणी, पार्डी, लहान, लोण या परिसरात हळद, गहू व हरभरा हे पिके जास्त मुबलक प्रमाणात आले आहेत़ त्यासाठी मजूरदार जास्त लागत आहेत़ पण ग्रामीण भागात कामगार वर्गाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीतील कामात अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ प्रामुख्याने शेती कामासाठी महिला वर्गाची आवश्यकता असते़ परंतु कालांतराने महिला मजुरांची कमी-कमी होत आहेत़ ग्रामीण भागातील महिला पुरुषाच्या खाद्यास खांदा लावून शिक्षणाच्या प्रवाहात जात आहे़ ग्रामीण भागातील महिला शिक्षण घेऊन लहान मोठे व्यवसाय करीत आहेत़ तसेच शिक्षण घेऊन नोकरीत आहेत़ यामुळे ग्रामीण भागात महिला मजूर मिळणे अशक्य झाले आहे़सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकºयांनी मजुरांची मजुरी वाढवली आहे़ महिला मजुरांना १०० ते १५० रुपये दिले जात आहे़ तर पुरुषांच्या मजुरीतसुद्धा वाढ झाली आहे़ पुरुष मजुरांना २०० ते २५० रुपये मजुरी देण्यात येत आहे़ गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात मजुरीत वाढ झाली आहे़ तरी पण मजुरांची कमतरता भासत आहे़ हळद काढणीसाठी १५ ते २० मजूर लागतात व मजुरांना १० ते १५ दिवस अगोदर सांगावे लागत आहे़ तरीसुद्धा कामगार निळत नसल्याचे चित्र दिसत आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी