शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:25 IST

भारतीय भू-वैज्ञानिक सर्व्हेक्षण विभाग नागपूरचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांनी गुरुवारी किनवट तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़ 

ठळक मुद्देगोकुंदा, भूलजा व दराटी येथे बसविली यंत्रणाभूकंपाचा केंद्रबिंदू किनवटपासून ५० कि़मी़ अंतरावर

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड ) : यवतमाळ जिल्ह्यासह नांदेडमधील किनवट, माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर, मुदखेड तालुक्याला २१ जून रोजी भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता़ या धक्क्यानंतर या परिसरात अजूनही घबराटीचे वातावरण आहे़ दरम्यान, या भागात झालेल्या भूकंपाच्या अनुषंगाने नागपूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञ किनवट तालुक्यात आले असून तालुक्यातील गोकुंदा, भूलजासह यवतमाळ जिल्ह्यातील दराटी येथे भूगर्भातील हालचालींची नोंद घेणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे़  

२१ जूनच्या रात्री ९.१२ वाजता किनवट, माहूर तालुक्यासह हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, भोकर, मुदखेडसह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात काही भागात भूकंपाच्या सौम्य धक्क्याची नोंद झाली होतीे़ या भूकंपाचा केंद्रबिंदू किनवटपासून ५० कि़मी़ अंतरावर असलेल्या तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात असल्याचे समोर आले होते़ या अनुषंगाने भारतीय भू-वैज्ञानिक सर्व्हेक्षण विभाग नागपूरचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांनी गुरुवारी किनवट तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़ 

२१ जून रोजी जमिनीतून अचानक गडगड असा आवाज येत हादरा बसला़ यामुळे काही घरातील भांडी पडली तर काही घरांच्या भिंतीला किरकोळ तडे गेले़ या धक्क्याची भूकंप मापक केंद्रावर ३.९ रिष्टर स्केलची इतकी नोंद झाली होती़ या अनुषंगाने जमिनीच्या खाली काय हालचाली होत आहेत याबाबतची माहिती मिळवण्यासाठी विदर्भातील दराटी व किनवट तालुक्यातील गोकुंदा, भुलजा या तीन ठिकाणी यंत्रणा बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ 

गोदावरी नदीची उपनदी कडम आहे़ याच ठिकाणी भूगर्भात हालचाली होत आहेत़ तेथील दगड कमजोर आहे़ कडम फाल्टमुळे २१ रोजी उत्तर पूर्व, दक्षिण पश्चिमी भूकंपाचा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले़ भूगर्भात अशा पद्धतीच्या हालचाली नेहमी सुरू असतात़ त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही़  किनवट व परिसरातील अन्य भाग भूकंपप्रवण क्षेत्र नाही़ सदर भूकंपाचा धक्का केवळ कडम फाल्टमध्ये झालेल्या हालचालीमुळे जाणवला असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूपेश कुरकुडे आणि भूभौतिमी वैज्ञानिक अक्षय जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ यावेळी त्यांच्यासोबत आरक़े़ठाकरे हे वैज्ञानिकही होते़ तीन जणांची ही टीम आठवडाभर किनवटसह माहूर, उमरखेड, हिमायतनगर आदी भागात भेटी देऊन पाहणी करणार आहेत़ तसेच भूगर्भाखालील हालचालींची नोंद घेणार आहेत़  दराटी, गोकुंदा व भुलजा येथे बसविलेली यंत्रणा जमिनीखाली काही हालचाली झाल्यास त्याची संगणकावर माहिती देत राहील, असेही भूपेश कुरकुडे यांनी सांगितले़

टॅग्स :EarthquakeभूकंपNandedनांदेडnagpurनागपूर