शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

पाच महिन्यांनंतर कारखान्यांचे बॉयलर झाले थंड, उसतोडणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना फटका

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: April 4, 2024 17:37 IST

चार जिल्ह्यांतील ऊस गाळप संपले, १ कोटी १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

नांदेड : नांदेड विभागात ५ ते १० नोव्हेंबरपासून सुरू झालेले सहकारी व खासगी अशा नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांचे बॉयलर अखेर पाच महिन्यांनंतर थंड झाले आहे. ऊसगाळप संपले असून, मार्च महिन्याअखेरीस सर्व कारखान्यांनी १ कोटी १७ लाख १२ हजार ६५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १ कोटी १९ लाख ८३,१०५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

नांदेड विभागासह मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास संपलेला आहे. त्यामुळे नांदेड सहसंचालक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर बंद झालेले आहेत. गेल्या वर्षी नांदेड विभागात उसाची लागवड उशिराने झाली होती. तसेच तोडणीवेळी अवकाळी पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस शिल्लक राहिल्याने यंदा मार्चअखेरपर्यंत कारखाने सुरू राहिले. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ऊसतोडणीसाठी शेतात वाहने जात नसल्याने अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ऊस गाळप सुरू होण्यास बराच विलंब झाला होता. यामुळे शेतातील ऊस बरेच दिवस पडून राहिल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू राहिली. तोडणीला येऊनही अनेक दिवस ऊस शेतातच राहिल्याने त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम झाला. एकरी ४० टन ऊस व्हायचा तिथे २५ ते ३० टनावर उतारा आला.

लातुरमध्ये सर्वाधिक ४९ लाख मे.टन ऊस गाळप२०२३-२४ या हंगामात लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ४९ लाख ५ हजार ९५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यातून ५२ लाख २२ हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील १९ लाख ४१ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १९ लाख ३२ हजार ६३५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर परभणी जिल्ह्यातील सात खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ३५ हजार ५४५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ३३ लाख ६८४० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १५ लाख २९ हजार २१८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून १५ लाख २० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक फटकाजिल्ह्यात यंदा ऊसलागवड जास्त आणि गाळप उशिराने सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस अनेक दिवस तोडणीअभावी शेतातच शिल्लक राहिला होता. काही शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या उसाची तोडणी पंधरा ते सोळा महिन्यांनंतर झाली. त्यामुळे उसाच्या वजनामध्ये मोठी घट झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNandedनांदेड